नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?


नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबरच्या रात्री नागा अतिरेकी गट NSCN (K-YA) च्या ठिकाणांवर एक मोठा ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी पी. आंग माई ठार झाल्याचे सांगितले.


ड्रोन स्ट्राईकमध्ये भारतविरोधी नागा अतिरेक्यांची कमांड पोस्ट आणि आजूबाजूच्या अतिरेक्यांच्या निवासी इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. याच हल्ल्यात भारतविरोधी नागा अतिरेक्यांचा स्वयंघोषीत वरिष्ठ कमांडर पी. आंग माई ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्ला झाल्यापासून कमांड युनिट आणि पी. आंग माई यांच्यातील संपर्क तुटला आहे.


याआधी जुलै २०२५ मध्ये भारत-म्यानमार सीमेवर अतिरेक्यांवर ड्रोन हल्ला झाला होता. उल्फा-आय, एनएससीएन (के) आणि युंग आंग आणि आंग माई गटांच्या अनेक लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्या हल्ल्यात नयन असोम, ब्रिगेडियर गणेश असोम आणि कर्नल प्रदीप असोम यांच्यासह तीन वरिष्ठ उल्फा-आय नेते मारले गेले होते. एनएससीएन (के) चे अनेक कमांडर देखील मारले गेले होते.


अचूक ड्रोन हल्ल्यांमुळे अतिरेक्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. हे हल्ले गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी माहिती तसेच भारत आणि म्यानमार यांच्यातील समन्वय याआधारे भारतीय सुरक्षा यंत्रणाच करत असल्याच्या बातम्या म्यानमारमधील प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. यावर भारताकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.


Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील