मोकाट कुत्र्यांचा हल्ला; मुरादाबादमध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू, परिसर हादरला

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


नुसरत नावाची चार वर्षांची मुलगी घराजवळ इतर मुलांसोबत खेळत होती. त्याचवेळी काही मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. सोबतची मुले घाबरून पळून गेली, मात्र नुसरत त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी तिला ओढत जवळच्या तलावाच्या दिशेने नेले. तलावाजवळ कुत्र्यांनी तिच्यावर वारंवार चावे घेतले. गंभीर जखमा झाल्याने आणि वेदना सहन न झाल्याने चिमुकलीने जागीच प्राण सोडले.


बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना नुसरतचे वडील तलावाजवळ पोहोचले असता त्यांना मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन