Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा (Flood Situation) मोठा फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, अनेक घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या नुकसानीतून नागरिक आणि विशेषतः शेतकरी जेमतेम सावरत असतानाच, पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत आणि त्रासात भर पडली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे आज, म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आजपासून (२१ ऑक्टोबर) राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार पावसाचे अलर्ट जारी केले आहेत. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



कुठे कुठे आहेत इशारे?




२१ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


२२ ऑक्टोबर, कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.


२३ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.


२४ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.


२५ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर (अहमदनगर). मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (या भागातील सर्व जिल्ह्यांसाठी).


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य