केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वीज पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. तिरुवनंतपुरम, कोझिकोड, कन्नूर आणि त्रिशूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान खात्याने 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

केरळच्या अनेक भागांमध्ये सोमवारी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली आणि वाहतुकीवर परिणाम झाला. दक्षिण तिरुवनंतपुरम तसेच उत्तरेकडील कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांतील डोंगराळ भागांमध्ये दिवसभर पावसाची संततधार होती आणि आकाशात ढग दाटले होते. सुमारे एक तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे तिरुवनंतपुरम-तेनकासी मार्गावर पाणी साचले, तर पलोडे येथील एलावट्टम रस्त्यावर संध्याकाळी वाहतूक ठप्प झाली.

कन्नूरमध्ये पूराचे पाणी काही घरांमध्ये आणि दुकानदारांच्या आवारात शिरले. या जिल्ह्यात पावसामुळे एका घरावर भिंत कोसळल्याचीही घटना घडली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील माला आणि एर्नाकुलममधील एलंजी येथे वीज कोसळल्यामुळे घरांचे नुकसान झाले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या घटनांमध्ये घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी झाली आहेत. त्रिशूरमधील पल्लिपुरम येथे एका घरावर झाड कोसळले, मात्र सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले.

दरम्यान, भारत हवामान विज्ञान विभागाने एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कोझिकोड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत भूस्खलन, दरड कोसळणे आणि अचानक पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ