दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी


फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही पारा वाढून 'अतिशय खराब' श्रेणीत; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर


नवी दिल्ली/मुंबई: दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे दिल्ली आणि मुंबई दोन्ही महानगरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला, AQI ४०० पार


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' ते 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. आज, मंगळवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) ४०० च्या वर नोंदवण्यात आला. अनेक भागांमध्ये हा निर्देशांक ४२० पर्यंत गेला, जो थेट 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

परिणामी, दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी झाली असून, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शांत हवामान आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्याने प्रदूषणाचे कण हवेत तसेच साचून राहिले आहेत.

मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात


दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईची हवाही अत्यंत खालावली आहे. दिवाळीनंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये AQI 'अतिशय खराब' श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.

आज, मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांत AQI मध्ये मोठी वाढ झाली असून, कुलाबा येथील वेधशाळेजवळ AQI ३४१ पर्यंत नोंदवला गेला. तसेच, वांद्रे, माझगाव आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्येही निर्देशांक ३०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक होता. मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये यंदा प्रथमच इतका उच्च AQI नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

AQI नुसार हवेच्या गुणवत्तेची श्रेणी:


०-५०: चांगली (Good)


५१-१००: समाधानकारक (Satisfactory)


१०१-२००: मध्यम (Moderate)


२०१-३००: खराब (Poor)


३०१-४००: अतिशय खराब (Very Poor)


४०१-५००: गंभीर (Severe)


दरम्यान, आणखी दोन दिवस दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येणार असल्याने प्रदूषणाची पातळी वाढतच रहाणार आहे. त्यामुळे, दिल्ली आणि मुंबईतील श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर

Vietnam Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाम बोट दुर्घटनेत २१ जणांना वाचवण्यात यश, १५ भारतीयांचा मृत्यू; दूतावासाकडून तातडीची मदत

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर

bus conductor arrested mangaluru : "मागच्या सीटवर या..." चालत्या बसमध्ये विद्यार्थिनींसमोर विकृत कंडक्टरचे अश्लील कृत्य; मंगळुरूतील घृणास्पद कृती!

मंगळुरू : कर्नाटकच्या (Karnatak) मंगळुरू (Mangluru) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे