दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी


फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही पारा वाढून 'अतिशय खराब' श्रेणीत; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर


नवी दिल्ली/मुंबई: दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे दिल्ली आणि मुंबई दोन्ही महानगरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला, AQI ४०० पार


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' ते 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. आज, मंगळवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) ४०० च्या वर नोंदवण्यात आला. अनेक भागांमध्ये हा निर्देशांक ४२० पर्यंत गेला, जो थेट 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

परिणामी, दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी झाली असून, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शांत हवामान आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्याने प्रदूषणाचे कण हवेत तसेच साचून राहिले आहेत.

मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात


दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईची हवाही अत्यंत खालावली आहे. दिवाळीनंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये AQI 'अतिशय खराब' श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.

आज, मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांत AQI मध्ये मोठी वाढ झाली असून, कुलाबा येथील वेधशाळेजवळ AQI ३४१ पर्यंत नोंदवला गेला. तसेच, वांद्रे, माझगाव आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्येही निर्देशांक ३०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक होता. मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये यंदा प्रथमच इतका उच्च AQI नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

AQI नुसार हवेच्या गुणवत्तेची श्रेणी:


०-५०: चांगली (Good)


५१-१००: समाधानकारक (Satisfactory)


१०१-२००: मध्यम (Moderate)


२०१-३००: खराब (Poor)


३०१-४००: अतिशय खराब (Very Poor)


४०१-५००: गंभीर (Severe)


दरम्यान, आणखी दोन दिवस दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येणार असल्याने प्रदूषणाची पातळी वाढतच रहाणार आहे. त्यामुळे, दिल्ली आणि मुंबईतील श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments
Add Comment

जपानकडून भारतीय आंब्यावर बंदी, तर चीनने तांदळाचे ७० साठे परतवले

दुहेरी फटका ! निर्यात प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज नवी दिल्ली :भारतीय आंबा निर्यातदारांना यंदाच्या हंगामात

आयएसआय-दाऊद नेटवर्कशी संबंधित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई करत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, दाऊद इब्राहिम

Rajasthan Sandstorm : राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर! भरदिवसा अंधार, ताशी ७० किमी वेगाने धुळीचा तांडव; वाहतूक ठप्प

जयपूर : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला

IPL Final 2026 : RCB vs GT फायनल : अकासा एअरकडून मुंबई आणि बंगळुरूहून अहमदाबादसाठी विशेष विमानांची घोषणा!

मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आता

CUET-UG 2026 : NEET पेपरफुटीचा वाद सुरू असतानाच CUET परीक्षेत मोठा गोंधळ! तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना २ तास प्रतीक्षा; पालक-विद्यार्थ्यांचा संताप

देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता कॉमन

Delhi Police : मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना यश! ISI शी संबंधित ९ संशयित अटकेत; ग्रेनेड, स्फोटकांसह घातक शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट दिल्ली