दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी


फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही पारा वाढून 'अतिशय खराब' श्रेणीत; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर


नवी दिल्ली/मुंबई: दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे दिल्ली आणि मुंबई दोन्ही महानगरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे दोन्ही शहरांतील नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येत आहे.

दिल्लीचा श्वास कोंडला, AQI ४०० पार


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) हवेची गुणवत्ता 'अतिशय खराब' ते 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. आज, मंगळवारी सकाळी दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) ४०० च्या वर नोंदवण्यात आला. अनेक भागांमध्ये हा निर्देशांक ४२० पर्यंत गेला, जो थेट 'गंभीर' श्रेणीत मोडतो.

परिणामी, दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत विषारी झाली असून, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शांत हवामान आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्याने प्रदूषणाचे कण हवेत तसेच साचून राहिले आहेत.

मुंबईकरांचेही आरोग्य धोक्यात


दिल्लीप्रमाणेच आर्थिक राजधानी मुंबईची हवाही अत्यंत खालावली आहे. दिवाळीनंतर मुंबईच्या अनेक भागांमध्ये AQI 'अतिशय खराब' श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.

आज, मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांत AQI मध्ये मोठी वाढ झाली असून, कुलाबा येथील वेधशाळेजवळ AQI ३४१ पर्यंत नोंदवला गेला. तसेच, वांद्रे, माझगाव आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्येही निर्देशांक ३०० च्या आसपास किंवा त्याहून अधिक होता. मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये यंदा प्रथमच इतका उच्च AQI नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

AQI नुसार हवेच्या गुणवत्तेची श्रेणी:


०-५०: चांगली (Good)


५१-१००: समाधानकारक (Satisfactory)


१०१-२००: मध्यम (Moderate)


२०१-३००: खराब (Poor)


३०१-४००: अतिशय खराब (Very Poor)


४०१-५००: गंभीर (Severe)


दरम्यान, आणखी दोन दिवस दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यात येणार असल्याने प्रदूषणाची पातळी वाढतच रहाणार आहे. त्यामुळे, दिल्ली आणि मुंबईतील श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Comments
Add Comment

Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar : मंचावर पोहोचताच पंतप्रधान मोदींनी मारली मिठी अन् वाकून पायही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार ?

कोलकाता : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi Eknath Shinde Meet : शपथविधी बंगालचा, चर्चा मात्र मोदी-शिंदेंची! मंचावरील हास्यकल्लोळाने वेधले संपूर्ण देशाचे लक्ष; नेमकं काय घडलं ?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान आज पलटले गेले. कोलकाता येथील ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड

Suvendhu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये 'अधिकारी' राज! शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी (R.N. Ravi) यांनी आज सकाळी ११ वाजता शुभेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रीपदाची

India New CDS Appointed : भारतीय नौदलाला मिळाले नवे प्रमुख! एन. एस. राजा सुब्रमणींकडे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ची कमान

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च नियुक्त्यांची

Thalapathy Vijay News : मोठी बातमी : थलपतीच्या शपथविधीला अनपेक्षित 'खो'...सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढला!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या नव्या राजकीय पक्षाचे

Suvendu Adhikari's Oath : शुभेंदू अधिकारी आज घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची