'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठी घटना! दिग्दर्शक रितेश देशमुखने दिलेले वचन केले पूर्ण

सातारा: अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या आगामी चित्रपटाच्या दरम्यान एका कलाकाराचा मृत्यू झाला. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव होते. साताऱ्यात शूटींग सुरु असताना नदीत बुडून सौरभचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सौरभच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे रितेशने आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी रितेशने दिवाळीमध्ये सौरभच्या आईकडे त्याच्या इन्शुरन्सची रक्कम हस्तांतरित केली आहे. या मदतीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी रितेशचे आभार मानले आहेत.


“ज्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पैसे पाठवले, त्याच दिवशी सौरभ शर्माच्या आईच्या अकाऊंटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यात आले. रितेशच्या या कृतीचं आम्ही कौतुक करतो. सौरभच्या कुटुंबीयांसाठी त्याने केलेल्या मदतीतून त्याची माणुसकी स्पष्टपणे दिसून येते”, असे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे त्यांनी म्हटले आहे.


साताऱ्यातील संगम माहुली परिसरात रितेशच्या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरू होते. या गाण्यात हळदीचे दृश्य असल्यामुळे शूटींगमध्ये सर्वांच्या अंगाला आणि कपड्यांना हळद लागली होती. त्यामुळे जवळच नदी असल्याने सर्वजण नदीवर अंघोळीसाठी गेले होते . या नदीमध्ये भोवरे होते सौरभला या गोष्टीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडायला लागला. यानंतर दोन दिवस सौरभचा शोध सुरू होता. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’