वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार


नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर 19 येथे आज मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता “दिया फॉर युनिटी – एक दिवा एकतेचा” हा दीपोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.


या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशाने मैदान उजळून निघणार आहे.


या दीपोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, एकही रुपयाची वर्गणी न घेता, कोणत्याही व्यक्तीकडून पैसा न मागता, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते यांनी घराघरातून दिवे, तेल आणि साहित्य आणून दिले आहे.
या उपक्रमात जातीभेद न करता सर्व हिंदू समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्धआणि अनुशासनबद्ध रितीने राबवण्यात आला आहे.


या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य विठ्ठल कांबळे हे असून, समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.


या दीपोत्सवामुळे समाजमनात एकतेचा संदेश आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होत आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती