वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार


नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर 19 येथे आज मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता “दिया फॉर युनिटी – एक दिवा एकतेचा” हा दीपोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.


या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशाने मैदान उजळून निघणार आहे.


या दीपोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, एकही रुपयाची वर्गणी न घेता, कोणत्याही व्यक्तीकडून पैसा न मागता, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते यांनी घराघरातून दिवे, तेल आणि साहित्य आणून दिले आहे.
या उपक्रमात जातीभेद न करता सर्व हिंदू समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्धआणि अनुशासनबद्ध रितीने राबवण्यात आला आहे.


या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य विठ्ठल कांबळे हे असून, समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.


या दीपोत्सवामुळे समाजमनात एकतेचा संदेश आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होत आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र