वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार


नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर 19 येथे आज मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता “दिया फॉर युनिटी – एक दिवा एकतेचा” हा दीपोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.


या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशाने मैदान उजळून निघणार आहे.


या दीपोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, एकही रुपयाची वर्गणी न घेता, कोणत्याही व्यक्तीकडून पैसा न मागता, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते यांनी घराघरातून दिवे, तेल आणि साहित्य आणून दिले आहे.
या उपक्रमात जातीभेद न करता सर्व हिंदू समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्धआणि अनुशासनबद्ध रितीने राबवण्यात आला आहे.


या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य विठ्ठल कांबळे हे असून, समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.


या दीपोत्सवामुळे समाजमनात एकतेचा संदेश आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होत आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली

Chandrashekar Bawankule : मानखुर्दमधील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी घेतली भेट मुंबई : मानखुर्द (पूर्व) मंडाला

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे