वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार


नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मैदान, सेक्टर 19 येथे आज मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता “दिया फॉर युनिटी – एक दिवा एकतेचा” हा दीपोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे.


या कार्यक्रमात विविध मान्यवर मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सुमारे दीड लाख दिव्यांच्या प्रकाशाने मैदान उजळून निघणार आहे.


या दीपोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, एकही रुपयाची वर्गणी न घेता, कोणत्याही व्यक्तीकडून पैसा न मागता, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते यांनी घराघरातून दिवे, तेल आणि साहित्य आणून दिले आहे.
या उपक्रमात जातीभेद न करता सर्व हिंदू समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्धआणि अनुशासनबद्ध रितीने राबवण्यात आला आहे.


या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदित्य विठ्ठल कांबळे हे असून, समाजाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.


या दीपोत्सवामुळे समाजमनात एकतेचा संदेश आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक दृढ होत आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर कडेकोट बंदोबस्त!

'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारी मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

 लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबई : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ

इच्छुकांच्या ह्दयात धडधड आणि पोटात भीतीचा गोळा; माजी नगरसेवकांसह सर्वांचे देवाला साकडे

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडत मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

महानगरपालिकेच्‍या अतिधोकादायक न्‍यू माहीम शाळेचा पुनर्विकास, पुन्हा त्याच ठिकाणी बांधणार शाळा

मुंबई (खास प्रतिनिधी) : न्‍यू माहीम महानगरपालिका  मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम