संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप


संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली असून हे दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.


दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लक्ष्मीपूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात यांचा हे पक्षातील सर्वात सिनियर नेत्यांपैकी एक नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते बडे प्रस्थ आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांची छवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते.


बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. हा पराभव अनेकांना धक्का देणारा होता.


यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेर मतदारसंघात साडे नऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. आम्हाला तहसीलदरांनी उत्तर दिले आहे की, असे कोणतंही नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही.


एका बाजूला तुम्ही सांगता की, आम्ही आदेश दिला आहे. चुका दुरुस्त करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सांगताय की, आम्हाला अधिकारच नाही. असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि हे अधिकारी करत आहेत का? ही शंका यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले