संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप


संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली असून हे दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.


दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लक्ष्मीपूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात यांचा हे पक्षातील सर्वात सिनियर नेत्यांपैकी एक नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते बडे प्रस्थ आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांची छवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते.


बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष संगमनेरचे प्रतिनिधित्व केले. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. हा पराभव अनेकांना धक्का देणारा होता.


यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेर मतदारसंघात साडे नऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. आम्हाला तहसीलदरांनी उत्तर दिले आहे की, असे कोणतंही नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही.


एका बाजूला तुम्ही सांगता की, आम्ही आदेश दिला आहे. चुका दुरुस्त करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सांगताय की, आम्हाला अधिकारच नाही. असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि हे अधिकारी करत आहेत का? ही शंका यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात