तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच पाण्याची तीव्र समस्या निर्माण होवू लागली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या अपुऱ्या दाबामुळे निर्माण झालेल्या पाणी समस्येबाबत विविध विभागांमधून नागरिकांच्या आणि पर्यायाने नगरसेवकांच्या तक्रारी येत असल्याने आता अधिकारीही हैराण झाले आहेत. मात्र, ही पाणी समस्या ऑक्टोबर हिट, दिवाळीचा सण आणि होवू घातलेली संभाव्य महापालिका निवडणूक हेच याला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे


मुंबईला दरदिवशी विविध धरण आणि तलावांमध्ये सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जात असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तलावातील उपलब्ध साठ्यानुसार ९९.५० टक्के एवढा पाणी साठा जमा झाला होता. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा आवश्यक असतो. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस पडून तलाव आणि धरणे भरल्यानंतरही मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध भागांमध्ये पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचा पाऊस महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पडलेला पहायला मिळत आहे. दिवाळीच्या तोंडावरच पाण्याच्या समस्या निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी प्रचंड आक्रमक बनलेले पहायला मिळत आहे.




गोकुळधाम परिसरात अशाचप्रकारे कमी दाबाने पाणी येत असल्याने स्थानिक भाजपाच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी महापालिका जलअभियंता यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते, तर जोगेश्वरी पूर्व भागांमध्ये पाणी समस्येबाबत उबाठा शिवसेनेचे आमदार बाळा नर यांनीही महापालिका के पूर्व विभागाचे सहायक आयुक्तांची भेट घेवून तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला होता, तर भाजपाचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी अंधेरी पूर्व येथील पोदारवाडी,शहाजी राजे रोड काही विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कोलडोंगरी गली नं २ , विजयनगर येथील अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत कार्यकारी अभियंता (जल विभाग) जैन, सहायक अभियंता (जल विभाग) शिंदे आणि के पूर्व जल विभागाच्या अभियंत्यांसोबत संक्षिप्त बैठक घेत चर्चा करत पाण्याच्या कमतरतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याच्या सूचना केल्या.


परंतु याबाबत महापालिका जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला दैनंदिन ४१०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, पण तक्रारीनंतर हा पाणी पुरवठा ४१५७ दशलक्ष लिटर पर्यंत वाढवून दिला जात आहे. सध्या ऑक्टोबर हिट असल्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढते. त्यातच दिवाळीचा सण असल्याने साफसफाई आणि इतर बाबींसाठीही जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पाण्याची मागणी ही या कालावधीत वाढली जाते. त्यातच आता आगामी काळात महापालिका सार्वत्रिक निवडणूक डोळयासमोर असल्याने काही इच्छुक तसेच विद्यमान माजी नगरसेवक हे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या समस्येचा मुद्दा अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्य जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कुठेही कमी पाणी नाही, त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यताच नाही. अंतर्गत जलवाहिन्यांमधील पुरवठ्यात काही अडचणी असल्यास सोसायटी तथा इमारतींसह वस्त्यांना कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेता जलअभियंता विभागाचे अभियंता पाहणी करत आहेत आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करत आहे

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.