दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील जवान देशाचे रक्षण करत असतो. त्यांची दिवाळी म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणे हेच होय. त्यामुळे भारतीय जवानांनासुद्धा सीमेचे रक्षण करताना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी फराळ पाठवण्यात आला आहे.


भारत विकास परिषदेने यावर्षी पनवेलमधून ६० हजार लाडू, ६० हजार चकल्या, १ हजार ८७५ किलो शेव, चिवडा आणि शंकरपाळे असा एकूण १३ हजार ५० किलोचा फराळ भारतीय जवानांना पाठवला आहे. भारत विकास परिषदेच्या या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग असतो. ज्यामुळे एवढा फरळ तयार करणे शक्य होते. यावर्षी या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.​​लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर आणि जैसलमेर प्रदेशातील सीमाभागात फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे.




यंदाही दिवाळीपूर्वीच पनवेलकरांचा फराळ भारताच्या सीमेवर पोहचविण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून केला आहे. सैनिकांना दिवाळीत फराळ मिळावा, हा उद्देश ठेवून जुलैपासून तयारी सुरू करण्यात आली होती. हा फराळ प्रत्येक सैनिकासाठी स्वतंत्र बॉक्स मध्ये पॅक करण्यात आला. ज्यात एका बॉक्समध्ये ४ लाडू, चकली, शेव, शंकरपाळी, चिवडा असा ९०० ग्रॅम वजनाचा फरळा भरण्यात आला आहे. असे पंधरा हजार बॉक्स तयार करण्यात आले.


लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी यावर्षी तब्बल ४० लाखांचा खर्च झाला. अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला. तसेच प्रत्यक्ष आर्थिक मदत करू न शकणाऱ्या व्यक्तींनी फराळाचे बॉक्स पॅकिंग करून श्रमदान केले. फराळाच्या बॉक्ससोबतच शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेली शुभेच्छापत्रेही पाठवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ

बीडमधील अजब प्रकार, अधिक महिन्याचं वाण थेट मांजराच्या पोटात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार

IND vs AFG Day 3 : भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी; मानव सुथारच्या जादुई गोलंदाजीने अफगाणिस्तानचा डाव १५२ धावांवर गारद

न्यू चंदीगड:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः