भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण


मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. यात भारतानं खूप काही केलं आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. मी पश्चिमेकडील एका लेखकाचा लेख वाचला. ज्यांनी लिहिलं होतं की, विश्वानं पूर्वेकडे पाहिलं पाहिजे मुख्यतः भारताकडे आणि त्याच्या प्राचीन धर्मग्रंथांकडे पाहिलं पाहिजे. त्या लेखकानं दोन महत्त्वाची नावं देखील घेतली होती. त्यामध्ये पतंजली आणि वशिष्ठ यांच्या नावचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशाचा दाखला दिल्यानंतरच आपण ते स्वीकारतो किंवा टाळ्या मिळतात. पण, प्राचीन धर्मग्रंथांची भारताला मोठी परंपरा लाभली आहे.


ती आपण जोपासली पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.मुंबईत भागवत यांच्या हस्ते 'आर्य युग विषय कोशा'चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. "पाश्चिमात्य देशातील ज्ञान आणि पुस्तकी भांडार समजून घेणे, ही चुकीची बाब नाही. पण आमचे ग्रंथ, सभ्यता, ज्ञानसाधना आणि परंपरा हेच आमचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारताला आपले मूळ, प्राचीन विद्या, विचार कायम ठेवत आधुनिकता बरोबर ताळमेळ ठेवावा लागेल," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध