भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण


मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. यात भारतानं खूप काही केलं आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. मी पश्चिमेकडील एका लेखकाचा लेख वाचला. ज्यांनी लिहिलं होतं की, विश्वानं पूर्वेकडे पाहिलं पाहिजे मुख्यतः भारताकडे आणि त्याच्या प्राचीन धर्मग्रंथांकडे पाहिलं पाहिजे. त्या लेखकानं दोन महत्त्वाची नावं देखील घेतली होती. त्यामध्ये पतंजली आणि वशिष्ठ यांच्या नावचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशाचा दाखला दिल्यानंतरच आपण ते स्वीकारतो किंवा टाळ्या मिळतात. पण, प्राचीन धर्मग्रंथांची भारताला मोठी परंपरा लाभली आहे.


ती आपण जोपासली पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.मुंबईत भागवत यांच्या हस्ते 'आर्य युग विषय कोशा'चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. "पाश्चिमात्य देशातील ज्ञान आणि पुस्तकी भांडार समजून घेणे, ही चुकीची बाब नाही. पण आमचे ग्रंथ, सभ्यता, ज्ञानसाधना आणि परंपरा हेच आमचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारताला आपले मूळ, प्राचीन विद्या, विचार कायम ठेवत आधुनिकता बरोबर ताळमेळ ठेवावा लागेल," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२

महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज

महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच

शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून