भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण


मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. यात भारतानं खूप काही केलं आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. मी पश्चिमेकडील एका लेखकाचा लेख वाचला. ज्यांनी लिहिलं होतं की, विश्वानं पूर्वेकडे पाहिलं पाहिजे मुख्यतः भारताकडे आणि त्याच्या प्राचीन धर्मग्रंथांकडे पाहिलं पाहिजे. त्या लेखकानं दोन महत्त्वाची नावं देखील घेतली होती. त्यामध्ये पतंजली आणि वशिष्ठ यांच्या नावचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशाचा दाखला दिल्यानंतरच आपण ते स्वीकारतो किंवा टाळ्या मिळतात. पण, प्राचीन धर्मग्रंथांची भारताला मोठी परंपरा लाभली आहे.


ती आपण जोपासली पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.मुंबईत भागवत यांच्या हस्ते 'आर्य युग विषय कोशा'चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. "पाश्चिमात्य देशातील ज्ञान आणि पुस्तकी भांडार समजून घेणे, ही चुकीची बाब नाही. पण आमचे ग्रंथ, सभ्यता, ज्ञानसाधना आणि परंपरा हेच आमचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारताला आपले मूळ, प्राचीन विद्या, विचार कायम ठेवत आधुनिकता बरोबर ताळमेळ ठेवावा लागेल," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मतदानाला जाताना ओळखीच्या पुराव्यांपैंकी एक पुरावा बाळगा जवळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या

मुंबईतील ८५ लाख मतदारांना झाले मतदार ओळखपत्रांचे वाटप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी

मुंबईत मतदान केंद्रासह परिसरही राखणार स्वच्छ

पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५

मकरसंक्रांतीचे महत्त्व सांगणारे मुलांसाठीचे भाषण

मुंबई : 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' हा प्रेमळ संदेश देत नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण. समाजातील एकतेची आणि