भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण


मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. यात भारतानं खूप काही केलं आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. मी पश्चिमेकडील एका लेखकाचा लेख वाचला. ज्यांनी लिहिलं होतं की, विश्वानं पूर्वेकडे पाहिलं पाहिजे मुख्यतः भारताकडे आणि त्याच्या प्राचीन धर्मग्रंथांकडे पाहिलं पाहिजे. त्या लेखकानं दोन महत्त्वाची नावं देखील घेतली होती. त्यामध्ये पतंजली आणि वशिष्ठ यांच्या नावचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशाचा दाखला दिल्यानंतरच आपण ते स्वीकारतो किंवा टाळ्या मिळतात. पण, प्राचीन धर्मग्रंथांची भारताला मोठी परंपरा लाभली आहे.


ती आपण जोपासली पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.मुंबईत भागवत यांच्या हस्ते 'आर्य युग विषय कोशा'चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. "पाश्चिमात्य देशातील ज्ञान आणि पुस्तकी भांडार समजून घेणे, ही चुकीची बाब नाही. पण आमचे ग्रंथ, सभ्यता, ज्ञानसाधना आणि परंपरा हेच आमचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारताला आपले मूळ, प्राचीन विद्या, विचार कायम ठेवत आधुनिकता बरोबर ताळमेळ ठेवावा लागेल," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.