दिवाळीचा आठवडा: 'या' ५ राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा! धनलाभाचे योग

मुंबई : दिवाळीच्या प्रकाशाने केवळ घरेच नव्हे, तर अनेकांचे नशीबही उजळून निघणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार, २० ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा नवीन आठवडा (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५) काही खास राशींसाठी आर्थिक प्रगती आणि भाग्योदयाचे संकेत घेऊन येत आहे. या आठवड्यात ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ असून, माता लक्ष्मी पाच राशींवर आपली विशेष कृपा करणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात धनवृद्धी आणि कामाच्या ठिकाणी मोठी सफलता मिळण्याचे योग आहेत.


ज्योतिष अभ्यासकांच्या मते, दिवाळीच्या शुभ मुहूर्तामुळे आणि ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे 'या' ५ राशींच्या जातकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे


१. वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा यश घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रात मोठे यश मिळेल आणि दीर्घकाळापासून अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगतीचे उत्तम संधी मिळतील, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा नव्या नफ्याची शक्यता घेऊन येत आहे.


२. कन्या (Virgo): कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अचानक धनलाभ किंवा धंद्यातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना उन्नतीचे योग आहेत. तुमचे काम करण्याची पद्धत आणि सकारात्मक विचार यात मोठी भूमिका बजावतील. व्यापाराच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल राहील.


३. वृश्चिक (Scorpio): वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ राहील. धनप्राप्तीचे योग बनत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. कार्यक्षेत्रात तुमची पकड आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोक आपली कामे वेळेवर पूर्ण करतील.व्यवसाय करणाऱ्यांना मोठे लाभ मिळण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.


४. धनु (Sagittarius): धनु राशीसाठी हा आठवडा आर्थिक प्रगती घेऊन येत आहे. तुमच्या मेहनतीला आणि कार्यक्षमतेला मोठे यश मिळेल. नोकरीत असलेल्यांना उन्नतीचे मोठे योग आहेत, ज्यामुळे पगार वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापार करणाऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल आहे. जर तुम्ही व्यवसायात आणखी वेळ आणि लक्ष दिले, तर नफा अनेक पटीने वाढू शकतो.


५. मीन (Pisces): मीन राशीच्या जातकांसाठी दिवाळीच्या योगामुळे अनेक नव्या उत्पन्न स्रोतांची शक्यता आहे. जुने कर्ज फेडण्यास मदत मिळेल. व्यापारामध्ये जबरदस्त नफा होईल. तसेच, सामाजिक स्तरावर तुमची मदत करण्याची वृत्ती तुम्हाला शनिदेवाचे वरदान मिळवून देईल.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या वादातून गोळीबारात तरुणाचा मृत्यू

जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून

जम्मू-काश्मीरमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त!

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व

Audi India: लक्झरी कारमेकर ऑडीकडून तीन सिग्नेचर Audi Q3,Audi Q5 कार भारतात दाखल

(Audi Q3) ऑडी क्यू३ सिग्नेचर लाइन आणि क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये पार्क असिस्ट प्लस, १२-व्ही आउटलेट आणि मागील डब्यात २

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव