मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण घाबरून जाण्याचे कारण नाही! एका नवीन अभ्यासामध्ये असे सुचवले आहे की, तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस अजून यायचे आहेत. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, मानवी मेंदूचे एकूण मानसिक कार्य प्रत्यक्षात ५५ ते ६० या वयोगटात शिखरावर पोहोचते. या वयोगटातील लोक जटिल समस्या सोडवण्याच्या कामांसाठी आणि कामाच्या ठिकाणी उच्चस्तरीय नेतृत्वाच्या भूमिकांसाठी सर्वोत्तम स्थितीत असू शकतात.


अभ्यासाचे लेखक, मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक गिल्स गिग्नॅक म्हणाले, ‘तुमचे तारुण्य जसजसे दूर जात जाईल, तसतसे तुम्हाला वाढत्या वयाची भीती वाटू शकते. पण आमचे संशोधन सांगते की, उत्साहित होण्यासाठी एक चांगले कारण आहे. आपल्यापैकी अनेकांसाठी, एकूण मानसिक कार्यक्षमता प्रत्यक्षात ५५ ते ६० या वयोगटात शिखरावर पोहोचते.


कदाचित आता वेळ आली आहे की, आपण मध्यम वयाला ‘काऊंटडाऊन’ मानणे थांबवावे आणि त्यास ‘शिखर’ म्हणून ओळखायला सुरुवात करावी. यापूर्वीच्या अभ्यासातून असे समोर आले होते की, ‘माणूस त्याच्या शारीरिक क्षमतेच्या शिखरावर पंचविशीच्या मध्यापासून ते तिशीच्या सुरुवातीस पोहोचतो, त्यामुळेच ॲथलिटस्ची कारकीर्द तुलनेने लहान असते. मात्र, बौद्धिक क्षमतेच्या शिखराबाबत चित्र अस्पष्ट होते.’ प्राध्यापक गिग्नॅक यांच्या टीमने पूर्वीच्या १६ प्रमुख संज्ञानात्मक आणि व्यक्तिमत्त्व-संबंधित गुणांचे विश्लेषण केले.


या १६ गुणांमध्ये नैतिक तर्कशक्ती, स्मरणशक्ती, प्रक्रिया गती, ज्ञान आणि भावनिक बुद्धिमत्ता यांचा समावेश होता. यामध्ये ‘बिग फाईव्ह’ व्यक्तिमत्त्व गुणधर्म-जसे की बहिर्मुखता, भावनिक स्थिरता, कर्तव्यनिष्ठा, अनुभवांसाठी मोकळेपणा आणि सहमतता यांचाही समावेश होता. प्राध्यापक गिग्नॅक यांच्या मते, या सर्व १६ गुणांचे वयानुसार होणारे बदल एकत्र करून पाहिल्यास, एक लक्षणीय नमुना समोर आला.


‘एकूण मानसिक कार्यक्षमता ५५ ते ६० या वयोगटात शिखरावर पोहोचली आणि नंतर सुमारे ६५ वर्षांनंतर ती कमी होऊ लागली. याचा अर्थ असा आहे की, ‘अनुभवामुळे आलेले शहाणपण आणि भावनिक समजूतदारपणा या काळात उच्चतम पातळीवर पोहोचतात, ज्यामुळे हा वयोगट जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी योग्य ठरतो.’

Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी