सीमेलगतची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवणार

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


नवी दिल्ली  :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या शेजारील देशांशी लागून असलेल्या ३० किलोमीटर सीमा भागातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली असून, राजस्थानसह इतर राज्यांमध्येही यासाठी तयारी केली जात आहे.


ही मोहीम सीमावर्ती भागांतील लोकसंख्येतील बदल रोखण्याच्या आणि घुसखोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गृह मंत्रालयाच्या अलीकडील सीमा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर विभागाचे संचालक आणि विविध राज्यांचे मुख्य सचिव यांना स्पष्ट निर्देश दिले की, सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सुनिश्चित करतील की सीमेपासून ३० किमी अंतराच्या आत कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि असल्यास तत्काळ हटवण्यात यावे.


प्रमुख राज्यांतील कारवाईचे तपशील


गुजरात : समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये कारवाई सुरू असून, पिरोटन बेटावर ४ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्यात आली आहेत.


उत्तर प्रदेश : नेपाळ सीमेला लागून असलेल्या लखीमपूर खिरी, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, महाराजगंज, बहराइच, बलरामपूर आणि पीलीभीत या जिल्ह्यांमध्ये २९८ अनधिकृत धार्मिक स्थळे ओळखण्यात आली असून त्यातील अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही लवकरच ही मोहीम राबवली जाणार आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने