सीमेलगतची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवणार

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


नवी दिल्ली  :केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या शेजारील देशांशी लागून असलेल्या ३० किलोमीटर सीमा भागातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली असून, राजस्थानसह इतर राज्यांमध्येही यासाठी तयारी केली जात आहे.


ही मोहीम सीमावर्ती भागांतील लोकसंख्येतील बदल रोखण्याच्या आणि घुसखोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गृह मंत्रालयाच्या अलीकडील सीमा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर विभागाचे संचालक आणि विविध राज्यांचे मुख्य सचिव यांना स्पष्ट निर्देश दिले की, सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सुनिश्चित करतील की सीमेपासून ३० किमी अंतराच्या आत कोणतेही अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि असल्यास तत्काळ हटवण्यात यावे.


प्रमुख राज्यांतील कारवाईचे तपशील


गुजरात : समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये कारवाई सुरू असून, पिरोटन बेटावर ४ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्यात आली आहेत.


उत्तर प्रदेश : नेपाळ सीमेला लागून असलेल्या लखीमपूर खिरी, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, महाराजगंज, बहराइच, बलरामपूर आणि पीलीभीत या जिल्ह्यांमध्ये २९८ अनधिकृत धार्मिक स्थळे ओळखण्यात आली असून त्यातील अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही लवकरच ही मोहीम राबवली जाणार आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन