'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचे शारिरीक त्रासामुळे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेत पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरुन काढण्यासाठी मालिकेत आता पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडी यांची निवड करण्यात आली आहे.


ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी या भूमिकेला चांगल्या उंचीवर नेले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल फार प्रेम निर्माण झाले होते. मालिकेत आता पूर्णा आजीची भूमिका रोहिणी हट्टंगडी करणार असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षक कशी पसंती देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्णा आजीच्या एण्ट्रीने मालिकेच्या सेटवरही आनंदाचे वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी हट्टंगडी यांचे मनापासून स्वागत केले. तर यापूर्वी रोहिणी हट्टंगडी यांनी 'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठीवरील मालिकेत आजीची भूमिका केली होती.


रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 'एखादी भूमिका एखाद्या कलाकाराने साकारलेली असते. लोकांच्या मनात त्याच कलाकाराची इमेज असते. दुसरं कोणीतरी त्या जागी आल्यावर काहींना ते आवडतं तर काहींना आवडत नाही. पण साधारणपणे त्या भूमिकेचा बाज कायम ठेवून अगदी तशीच ती भूमिका होणार नाही कदाचित कुठे कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे माझ्या मनात आज संमिश्र भावना आहेत. हे मी पहिल्यांदाच करत आहे. लोकांना आवडेल की नाही हा मोठा प्रश्न मनात आहे. पण मराठी प्रेक्षकांना विचारात घेता आजपर्यंत माझा अनुभव आहे की मराठी प्रेक्षक खूप दिलदार आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे नक्कीच ते स्वीकारतील. मला खूप आनंद होईल.''


Comments
Add Comment

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे

काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो

पाचवा वेद - भालचंद्र कुबल हल्ली पाचवा वेद छापून आला आणि तो समाज माध्यमातून व्हायरल झाला की फोन यायला सुरुवात

‘साज़-ए-गझल’: सुरांचा आणि शब्दांचा हृद्य अनुभव

गझल... म्हणजे नुसते शब्द नव्हेत, ती आहे प्रत्येक भावना शब्दांत गुंफण्याची कला! विरह, प्रेम, जीवन आणि आत्मचिंतन