राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावर बोट ठेवत एक धक्कादायक दावा केला आहे. "१ जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी गोठवली असताना त्यानंतर राज्यात तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची भर घातली गेली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


राज ठाकरे यांच्या या आरोपावर आता ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मजेशीर प्रत्यत्तर दिले आहे. "ज्यांनी आयुष्यात प्रथमच मतदार याद्या पाहिल्या असाव्यात, त्यांना मतदार बोगस आहे की खरे कसे कळणार?" असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.


त्याचप्रमाणे, "पूर्वी ईव्हीएमवर शंका घेतली, आता मतदार यादीवर संशय घेत आहेत. पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यावर अशी कारणं शोधली जात आहेत," अशी खोचक प्रतिक्रिया देत गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.


तसेच संजय राऊत यांनी मोर्चा काढण्याची दिलेली धमकीही गोरे यांनी फेटाळली. "त्यांच्या हातात आता काहीच राहिले नाही. लोकांचं पाठबळही संपलं आहे. त्यामुळे निवडणुकांपासून पळण्याचे हे नवे मार्ग आहेत," असे गोरे म्हणाले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र