केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा


नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने केरळमधील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा, वीजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा इशारा दिला आहे. याशिवाय, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाने केरळच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, मल्लप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.शनिवारी उशिरा रात्रीपासून इडुक्की जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील नेदुमकंदम, कमिली आणि कट्टाप्पना या भागांत पूराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. अनेक रस्ते तलावासारखे झाले असून बचाव कार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितरित्या राहत छावण्यांमध्ये हलवले जात आहे. मुल्लापेरियार धरणाचा पाण्याचा पातळी झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.


केरळमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम तामिळनाडूवरही झाला आहे. मुल्लापेरियार धरणाचे 13 दरवाजे 100 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले असून, सुमारे 1400 क्यूसेक पाणी सोडले गेले आहे. याशिवाय, इतर तीन धरणांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे. एर्नाकुलममध्ये संपूर्ण रात्र जोरदार पाऊस झाला. यामुळे एर्नाकुलम रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. आजूबाजूच्या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.


पूराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.खराब हवामान लक्षात घेता मच्छिमारांना 22 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


तामिळनाडूमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोयंबटूर जिल्ह्यातील डोंगराळ भाग, तसेच नीलगिरी, इरोड, तिरुप्पूर, थेनी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये भारी ते अतिभारी पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि