केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा


नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने केरळमधील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा, वीजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा इशारा दिला आहे. याशिवाय, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाने केरळच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, मल्लप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.शनिवारी उशिरा रात्रीपासून इडुक्की जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील नेदुमकंदम, कमिली आणि कट्टाप्पना या भागांत पूराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. अनेक रस्ते तलावासारखे झाले असून बचाव कार्य सुरू आहे. लोकांना सुरक्षितरित्या राहत छावण्यांमध्ये हलवले जात आहे. मुल्लापेरियार धरणाचा पाण्याचा पातळी झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.


केरळमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम तामिळनाडूवरही झाला आहे. मुल्लापेरियार धरणाचे 13 दरवाजे 100 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले असून, सुमारे 1400 क्यूसेक पाणी सोडले गेले आहे. याशिवाय, इतर तीन धरणांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे. एर्नाकुलममध्ये संपूर्ण रात्र जोरदार पाऊस झाला. यामुळे एर्नाकुलम रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. आजूबाजूच्या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.


पूराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.खराब हवामान लक्षात घेता मच्छिमारांना 22 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


तामिळनाडूमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोयंबटूर जिल्ह्यातील डोंगराळ भाग, तसेच नीलगिरी, इरोड, तिरुप्पूर, थेनी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये भारी ते अतिभारी पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या