मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ? असा रोकडा सवाल कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील काही नेते राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.


बीडमध्ये नुकताच ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. या मोर्चात छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा घंटानाद करत मराठा आंदोलक मनोज जरांगे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या संदर्भात प्रतिक्रिया विचारताच विखे पाटील आरक्षणाच्या मुद्यावर थेट सवाल उपस्थित केला.


ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का ? असा रोकडा सवाल करत विखे पाटील यांनी पलटवार केला. मराठा-कुणबी जीआरमुळे ओबीसी आरक्षण कमी झालं आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा विषय मार्गी लावला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे; असेही विखे पाटील म्हणाले.



ओबीसी आरक्षणाला धक्का नाही


ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शोभणारं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण करू नयेत. महाराष्ट्रात कधीच ‘ओबीसी दिवाळी’ आणि ‘मराठा दिवाळी’ अशी विभागणी झालेली नाही. आपण सर्वजण एकत्र राहणारे आहोत; असे विखे पाटील म्हणाले.



दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांसोबत बैठक


दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. न्यायमूर्ती शिंदे यांनाही त्या बैठकीत सहभागी करून विषय स्पष्ट केला जाईल. छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा करणार असून त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून