मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला दिलेल्या या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ? असा रोकडा सवाल कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील काही नेते राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.


बीडमध्ये नुकताच ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. या मोर्चात छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा घंटानाद करत मराठा आंदोलक मनोज जरांगे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या संदर्भात प्रतिक्रिया विचारताच विखे पाटील आरक्षणाच्या मुद्यावर थेट सवाल उपस्थित केला.


ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का ? असा रोकडा सवाल करत विखे पाटील यांनी पलटवार केला. मराठा-कुणबी जीआरमुळे ओबीसी आरक्षण कमी झालं आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा विषय मार्गी लावला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे; असेही विखे पाटील म्हणाले.



ओबीसी आरक्षणाला धक्का नाही


ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शोभणारं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्ये ओबीसी आहे. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण करू नयेत. महाराष्ट्रात कधीच ‘ओबीसी दिवाळी’ आणि ‘मराठा दिवाळी’ अशी विभागणी झालेली नाही. आपण सर्वजण एकत्र राहणारे आहोत; असे विखे पाटील म्हणाले.



दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांसोबत बैठक


दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. न्यायमूर्ती शिंदे यांनाही त्या बैठकीत सहभागी करून विषय स्पष्ट केला जाईल. छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा करणार असून त्यांचा गैरसमज दूर केला जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे