लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी

मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक


नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.


तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा