IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना आज पर्थमध्ये रंगणार

कॅनबेरा : - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. जे दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय जर्सीमध्ये मैदानावर परतणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हे दोन अनुभवी क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळतील. रोहित आणि कोहली या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळले आणि आता मैदानात परतणार आहेत.


गेल्या सात महिन्यांत रोहित आणि कोहलीसाठी बरेच काही बदलले आहे. दोघेही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. पण ही मालिका जागतिक स्पर्धेसाठी त्यांची तंदुरुस्ती निश्चित करेल. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सराव केला आहे. रोहितने वजन देखील कमी केले आहे. पण फॉर्ममध्ये परतणे दोघांसाठीही एक आव्हान असेल. कारण ते आयपीएलपासून खेळलेले नाहीत. दोघांसाठीही चांगली बाब अशी आहे की, त्यांचे पुनरागमन ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. कांगारुंविरुद्ध त्यांचा चांगला रेकॉर्ड आहे. ही मालिका त्यांच्या कारकिर्दीची भविष्यातील दिशा ठरवणारी आहे.


रोहित आणि कोहली आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतात. ते पुन्हा एकदा मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवुडशी सामना करतील. रोहित कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होईल. ज्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकेल. रोहित आणि कोहली यांच्या मनात २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक असेल यात शंका नाही. जर कोहली त्याच्या नेहमीच्या शैलीत लांब डाव खेळला आणि रोहितने चांगली सुरुवात केली. तर दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंची कारकीर्द आणखी काही वर्षे वाढू शकते.


गिलने कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून आपले कौशल्य दाखवले आहे. आणि आता त्याच्यासमोर एकदिवसीय सामन्यांमध्ये ही गती कायम ठेवण्याचे आव्हान आहे. गिलसाठी आनंदाची बाबअशी आहे की, त्याला अशा वेळी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जेव्हा रोहित आणि कोहली देखील संघाचा भाग आहेत. त्याला या दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंकडून सल्ला घेण्याची संधी मिळेल. संघ संयोजनाबाबत, संघ व्यवस्थापन रोहित आणि गिलच्या सलामी जोडीशी छेडछाड करेल अशी शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत, यशस्वी जयस्वालला त्याच्या संधीची वाट पहावी लागू शकते.


रोहित आणि गिल डावाची सुरुवात करतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल. राहुलकडे विकेटकीपिंगचीही जबाबदारी असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकत नाही. त्यामुळे नितीश कुमार रेड्डीला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करतील, तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग जलद गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

Comments
Add Comment

IPL 2026 MI vs SRH : वानखेडेवर मुंबईचा पुन्हा पराभव, हैदराबादचा दमदार ६ विकेट्सने विजय

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४१ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद ने मुंबई इंडियन्स ला ६ विकेट्सने पराभूत करत शानदार

IPL 2026 RR vs PBSK : राजस्थान रॉयल्स 6 विकेट्सने विजयी, पंजाबचा पहिलाच पराभव

चंदीगड : यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, त्यानंतर डोनोव्हान फरेरा आणि प्रभावी खेळाडू शुभम दुबे यांच्यातील शानदार

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा