साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण अनेकदा ऐकले आहे. साखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. बऱ्याचदा डॉक्टर साखर न खाण्याचा सल्लाही देतात. मात्र साखर न खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आपल्याला माहित नसते.


विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखरेपासून लांबच राहावे. मात्र साखर खाल्याने मधुमेह सोडून इतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे आपल्याला माहित नसते. अनेकदा आपल्याला या समस्या उद्भवतात, मात्र हे साखरेमुळे होत आहे याबद्दल आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे जाणून घेऊया साखरेमुळे शरीरावर काय परिणाम होतात.


जास्त साखरेचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेमुळे वजनात वाढ होते. जे शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच हृदयरोग, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचे वृद्धत्व वाढणे, मूड बिघडणे असेही प्रकार साखरेमुळे अनुभवास येतात. मात्र हा त्रास साखरेमुळे होतोय, याची जाणीव आपल्याला नसते.


या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही फक्त २१ दिवस साखर खाणे बंद करा. साखर खाणे बंद केले तरी ताजी फळे खाऊन अथवा मर्यादीत प्रमाणात उसाचा रस पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता.


कृत्रिम साखर न खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन वाढत नाही. साखरेचे सेवन बंद केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. ज्यामुळे आयुष्यभर मधुमेहाच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. साखर न खाल्ल्याने त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. अशाप्रकारे साखर खाणे बंद केल्यास अनेक फरक शरीरात दिसतात.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला

फेस स्टीम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात,

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

नवं वर्षाचे स्वागत कसे करावे? जाणून घ्या खास टिप्स्

मुंबई: नववर्षाच्या स्वागताला केवळ दोन दिवस उरले आहेत. नवे वर्ष, नव्या आशा, नवी स्वप्न या सर्वांसाठीचे नियोजन