साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण अनेकदा ऐकले आहे. साखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. बऱ्याचदा डॉक्टर साखर न खाण्याचा सल्लाही देतात. मात्र साखर न खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आपल्याला माहित नसते.


विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखरेपासून लांबच राहावे. मात्र साखर खाल्याने मधुमेह सोडून इतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे आपल्याला माहित नसते. अनेकदा आपल्याला या समस्या उद्भवतात, मात्र हे साखरेमुळे होत आहे याबद्दल आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे जाणून घेऊया साखरेमुळे शरीरावर काय परिणाम होतात.


जास्त साखरेचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेमुळे वजनात वाढ होते. जे शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच हृदयरोग, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचे वृद्धत्व वाढणे, मूड बिघडणे असेही प्रकार साखरेमुळे अनुभवास येतात. मात्र हा त्रास साखरेमुळे होतोय, याची जाणीव आपल्याला नसते.


या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही फक्त २१ दिवस साखर खाणे बंद करा. साखर खाणे बंद केले तरी ताजी फळे खाऊन अथवा मर्यादीत प्रमाणात उसाचा रस पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता.


कृत्रिम साखर न खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन वाढत नाही. साखरेचे सेवन बंद केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. ज्यामुळे आयुष्यभर मधुमेहाच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. साखर न खाल्ल्याने त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. अशाप्रकारे साखर खाणे बंद केल्यास अनेक फरक शरीरात दिसतात.

Comments
Add Comment

संजीवनी सैनिकी स्कूल राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम

कोपरगाव : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे भारत सरकारच्या संरक्षण

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

चीनसोबत करार केल्यास कॅनडावर १०० टक्के टॅरिफ लावणार: ट्रम्प

वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला कडक इशारा देत सांगितले आहे की, कॅनडाने जर

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला