साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण अनेकदा ऐकले आहे. साखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. बऱ्याचदा डॉक्टर साखर न खाण्याचा सल्लाही देतात. मात्र साखर न खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आपल्याला माहित नसते.


विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखरेपासून लांबच राहावे. मात्र साखर खाल्याने मधुमेह सोडून इतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे आपल्याला माहित नसते. अनेकदा आपल्याला या समस्या उद्भवतात, मात्र हे साखरेमुळे होत आहे याबद्दल आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे जाणून घेऊया साखरेमुळे शरीरावर काय परिणाम होतात.


जास्त साखरेचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेमुळे वजनात वाढ होते. जे शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच हृदयरोग, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचे वृद्धत्व वाढणे, मूड बिघडणे असेही प्रकार साखरेमुळे अनुभवास येतात. मात्र हा त्रास साखरेमुळे होतोय, याची जाणीव आपल्याला नसते.


या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही फक्त २१ दिवस साखर खाणे बंद करा. साखर खाणे बंद केले तरी ताजी फळे खाऊन अथवा मर्यादीत प्रमाणात उसाचा रस पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता.


कृत्रिम साखर न खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन वाढत नाही. साखरेचे सेवन बंद केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. ज्यामुळे आयुष्यभर मधुमेहाच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. साखर न खाल्ल्याने त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. अशाप्रकारे साखर खाणे बंद केल्यास अनेक फरक शरीरात दिसतात.

Comments
Add Comment

पर्थमध्ये झाला अनर्थ, पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरू आहे.

२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून