साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असे आपण अनेकदा ऐकले आहे. साखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. बऱ्याचदा डॉक्टर साखर न खाण्याचा सल्लाही देतात. मात्र साखर न खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे आपल्याला माहित नसते.


विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांना साखरेपासून लांबच राहावे. मात्र साखर खाल्याने मधुमेह सोडून इतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे आपल्याला माहित नसते. अनेकदा आपल्याला या समस्या उद्भवतात, मात्र हे साखरेमुळे होत आहे याबद्दल आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे जाणून घेऊया साखरेमुळे शरीरावर काय परिणाम होतात.


जास्त साखरेचे सेवन केल्याने टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. साखरेमुळे वजनात वाढ होते. जे शरीरासाठी हानिकारक ठरते. तसेच हृदयरोग, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि दात किडण्याची शक्यता अधिक असते. त्वचेचे वृद्धत्व वाढणे, मूड बिघडणे असेही प्रकार साखरेमुळे अनुभवास येतात. मात्र हा त्रास साखरेमुळे होतोय, याची जाणीव आपल्याला नसते.


या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही फक्त २१ दिवस साखर खाणे बंद करा. साखर खाणे बंद केले तरी ताजी फळे खाऊन अथवा मर्यादीत प्रमाणात उसाचा रस पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकता.


कृत्रिम साखर न खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन वाढत नाही. साखरेचे सेवन बंद केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो. ज्यामुळे आयुष्यभर मधुमेहाच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही. साखर न खाल्ल्याने त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. अशाप्रकारे साखर खाणे बंद केल्यास अनेक फरक शरीरात दिसतात.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार

रेड फोर्ट स्फोटानंतर 'शाह' ॲक्शन मोडमध्ये! गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी रेड फोर्टजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर,

New DSP NFO Launch: डीएसपी म्युच्युअल फंडाकडून ईटीएफसह इतर फंडातील एक्सपोजरसाठी Passive रेंजमध्ये वाढ !

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निर्देशांकाद्वारे गुंतवणूकदारांना भारतातील लार्ज आणि मिडकॅप संधींमध्ये

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

एआय ही समस्या नाही तर हवामान आव्हानाचा उपाय आहे: केपीएमजी इंटरनॅशनल रिपोर्ट

९६ टक्के कार्यकारी अधिकारी मानतात की स्वच्छ ऊर्जा एआयच्या मागण्या पूर्ण करू शकते, जरी १३ टक्के लोक स्वच्छ ऊर्जा

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू