आरोपी भूषण पतंगेचा उपचारादरम्यान मृत्यू

अलिबाग  : अलिबाग येथील बनावट नोटाप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय आरोपी भूषण पतंगेचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केल्यामुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे; परंतु, पोलिसांनी हा आरोप खोडून काढत आरोपीला फिट येण्याचा गंभीर आजार असल्याने त्याच्यावर जे. जे. उपचार रुग्णालयात सुरू होते असे म्हटले आहे.


अलिबाग शहरातील भूषण पतंगेच्या घरातून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा लाखो रुपयांचा साठा अलिबाग पोलिसांनी जप्त केला होता. ही कारवाई शुक्रवार ३ ऑक्टोबरदरम्यान अलिबाग करण्यात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली आली होती. पतंगेला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याला फीट येण्याचा गंभीर आजार असून, सीटीस्कॅन करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, नातेवाईकांनी त्याला चौकशीदरम्यान पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच तो दगावल्याचा आरोप केला. भूषणच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे यांच्याकडे होता, तर चौकशीदरम्यान आरोपी भूषण पतंगेची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु पुरेशी यंत्रणा नसल्याने त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू
झाल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.