मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या सेवनामुळे अनेक लहान मुलं दगावल्याने देशभर खळबळ माजलेली आहे. असे असताना आता त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर एका मालगाडीतून सुमारे २ कोटी किमतीचे बंदी घातलेले खोकल्याचे सिरप जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या आणि शुक्रवारी पहाटे संपलेल्या शोध मोहिमेनंतर ही जप्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुरा पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवत, सरकारी रेल्वे पोलिस दल, सीमाशुल्क विभाग आणि विशेष कार्य दल यांनी ही संयुक्त कारवाई केली."


याचबरोबर पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "संयुक्त छाप्यादरम्यान, पथकांनी पश्चिम त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या दोन मालगाड्यांच्या वॅगनमधून बंदी घातलेल्या खोकल्याच्या सिरपच्या १०० मिलीच्या तब्बल ९० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत." याप्रकरणी अद्यापपर्यंत तरी कुणावरीही अटकेची कारवाई झालेली नव्हती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


भारतात मागील काही दिवसांत कफ सिरप घेतल्याने किडनी निकामी होवून किमान २२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून, कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन कफ सिरपना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

Comments
Add Comment

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.