Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीमुळे सध्या तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात सुरक्षा रक्षक (Security Guards) पुरवण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाला'चे पॅकेट देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि जगभरातील विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र स्थान असून, अशा पवित्र ठिकाणी मांसाहाराशी संबंधित वस्तू दिवाळी भेट म्हणून दिल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकाराबद्दल बीव्हीजी कंपनीवर आणि मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.



पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवरून वाद


पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी 'माऊली माऊली'चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. या परंपरेत मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना थारा नसतो. अशा पवित्र ठिकाणी मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाल्या'सारख्या वस्तूंचे वाटप झाल्यामुळे अनेक भक्तांमध्ये आणि वारकरी संप्रदायात तीव्र भावनिक रोष (Emotional Outrage) व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनी (BVG Company) ही मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून इतर उत्पादनांसोबतच भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट देण्यात आले. याच कारणामुळे आता वारकरी संप्रदायातून या भेटवस्तूबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.



बीव्हीजी ग्रुपकडून नियमांचे उल्लंघन?


पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी ग्रुप बद्दलची माहिती सध्या चर्चेत आहे. या ग्रुपला तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांचा हा महत्त्वाचा ठेका मिळाला आहे. मे महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्यामुळे त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मंदिराने निविदा (Tenders) प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सींनी यासाठी दर (Rates) दिले होते. या आठही एजन्सीने सर्व्हिस चार्जेस म्हणून ३.८५% इतका समान दर कोट केल्याची माहिती आहे बीव्हीजी कंपनी मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवणार आहे. या कर्मचाऱ्यांचा वापर मंदिर दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या ठिकाणी केला जाणार आहे. याशिवाय, यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारीही बीव्हीजीवर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजीसाठी मंदिर समितीची नियमावली असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपवर असणार आहे.

Comments
Add Comment

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या