Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीमुळे सध्या तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात सुरक्षा रक्षक (Security Guards) पुरवण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाला'चे पॅकेट देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि जगभरातील विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र स्थान असून, अशा पवित्र ठिकाणी मांसाहाराशी संबंधित वस्तू दिवाळी भेट म्हणून दिल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकाराबद्दल बीव्हीजी कंपनीवर आणि मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.



पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवरून वाद


पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी 'माऊली माऊली'चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. या परंपरेत मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना थारा नसतो. अशा पवित्र ठिकाणी मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाल्या'सारख्या वस्तूंचे वाटप झाल्यामुळे अनेक भक्तांमध्ये आणि वारकरी संप्रदायात तीव्र भावनिक रोष (Emotional Outrage) व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनी (BVG Company) ही मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून इतर उत्पादनांसोबतच भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट देण्यात आले. याच कारणामुळे आता वारकरी संप्रदायातून या भेटवस्तूबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.



बीव्हीजी ग्रुपकडून नियमांचे उल्लंघन?


पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी ग्रुप बद्दलची माहिती सध्या चर्चेत आहे. या ग्रुपला तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांचा हा महत्त्वाचा ठेका मिळाला आहे. मे महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्यामुळे त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मंदिराने निविदा (Tenders) प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सींनी यासाठी दर (Rates) दिले होते. या आठही एजन्सीने सर्व्हिस चार्जेस म्हणून ३.८५% इतका समान दर कोट केल्याची माहिती आहे बीव्हीजी कंपनी मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवणार आहे. या कर्मचाऱ्यांचा वापर मंदिर दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या ठिकाणी केला जाणार आहे. याशिवाय, यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारीही बीव्हीजीवर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजीसाठी मंदिर समितीची नियमावली असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपवर असणार आहे.

Comments
Add Comment

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

Jejuri Accdent : जेजुरी दुर्घटनेनंतर वारीत आणखी एक अपघात; अहिल्यानगरात भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले

पुणे : पुण्यातील जेजुरीजवळ (Jejuri) ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेल्या भीषण अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच वारीत