ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. यात पक्षांतराला सुद्धा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: राजन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.


राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा लढवल्या. यावेळी महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. मात्र आता महायुतीमधील नेते एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र पक्ष म्हणुन लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीतून पक्षांतर निर्णय घेतल्याचे लक्षात येते.


माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर नेम साधला. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते देखील भाजपमध्ये येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.


Comments
Add Comment

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने