ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. यात पक्षांतराला सुद्धा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: राजन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.


राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा लढवल्या. यावेळी महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. मात्र आता महायुतीमधील नेते एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र पक्ष म्हणुन लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीतून पक्षांतर निर्णय घेतल्याचे लक्षात येते.


माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर नेम साधला. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते देखील भाजपमध्ये येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.


Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये