ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू झाली आहे. यात पक्षांतराला सुद्धा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: राजन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे.


राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा लढवल्या. यावेळी महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. मात्र आता महायुतीमधील नेते एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र पक्ष म्हणुन लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीतून पक्षांतर निर्णय घेतल्याचे लक्षात येते.


माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर पाटलांनी टीका केली आहे. मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही, अशा शब्दात राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर नेम साधला. तसेच माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते देखील भाजपमध्ये येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.


Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच