मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पियूष गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मढ-वर्सोवा पुलामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार अखेर प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांकरीता पाठपुरावा केला होता. पर्यावरणाचे सर्व आवश्यक संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करून या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची अमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


मुंबईकरांसाठी २२ किमीचे अंतर आता ५ मिनिटांत


मढ-वर्सोवा पूल प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. प्रवासाच्या वेळेत कमी : प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांत होईल.
२. अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर कमी होईल.
३. लांब अंतर पार करण्याची किंवा नौका चालनाची आवश्यकता नष्ट करण्यासाठी थेट
४. रस्त्याचा संपर्क


५. पश्चिम मुंबईत निर्बाध प्रवासासाठी आगामी वर्सोवा-भायंदर तटीय रस्त्याशी एकत्रीकरण.
६.प्रवासाचे अंतर आणि वेळकमी होईल.
७.हजारो प्रवासी, स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणार.
८.स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल


मढ-वर्सोवा ब्रिज प्रकल्पामुळे मढ द्वीपापासून वर्सोवा पर्यंतचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे महानगरातील नागरिकांना आधुनिक, कार्यक्षम आणि भविष्यातील आवश्यकतांसाठी तयार सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळेल. याशिवाय, दहिसर-भायंदर तटीय रस्ता प्रकल्प, मलाड क्षेत्रात समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याशी जोडणारे तीन पूल आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२०० रुपये कोटींचा प्रकल्प, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळेही पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल
घडवून आणेल.

Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक