मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पियूष गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मढ-वर्सोवा पुलामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार अखेर प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांकरीता पाठपुरावा केला होता. पर्यावरणाचे सर्व आवश्यक संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करून या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची अमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


मुंबईकरांसाठी २२ किमीचे अंतर आता ५ मिनिटांत


मढ-वर्सोवा पूल प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. प्रवासाच्या वेळेत कमी : प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांत होईल.
२. अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर कमी होईल.
३. लांब अंतर पार करण्याची किंवा नौका चालनाची आवश्यकता नष्ट करण्यासाठी थेट
४. रस्त्याचा संपर्क


५. पश्चिम मुंबईत निर्बाध प्रवासासाठी आगामी वर्सोवा-भायंदर तटीय रस्त्याशी एकत्रीकरण.
६.प्रवासाचे अंतर आणि वेळकमी होईल.
७.हजारो प्रवासी, स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणार.
८.स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल


मढ-वर्सोवा ब्रिज प्रकल्पामुळे मढ द्वीपापासून वर्सोवा पर्यंतचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे महानगरातील नागरिकांना आधुनिक, कार्यक्षम आणि भविष्यातील आवश्यकतांसाठी तयार सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळेल. याशिवाय, दहिसर-भायंदर तटीय रस्ता प्रकल्प, मलाड क्षेत्रात समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याशी जोडणारे तीन पूल आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२०० रुपये कोटींचा प्रकल्प, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळेही पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल
घडवून आणेल.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण