मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पियूष गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मढ-वर्सोवा पुलामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार अखेर प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांकरीता पाठपुरावा केला होता. पर्यावरणाचे सर्व आवश्यक संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करून या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची अमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


मुंबईकरांसाठी २२ किमीचे अंतर आता ५ मिनिटांत


मढ-वर्सोवा पूल प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. प्रवासाच्या वेळेत कमी : प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांत होईल.
२. अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर कमी होईल.
३. लांब अंतर पार करण्याची किंवा नौका चालनाची आवश्यकता नष्ट करण्यासाठी थेट
४. रस्त्याचा संपर्क


५. पश्चिम मुंबईत निर्बाध प्रवासासाठी आगामी वर्सोवा-भायंदर तटीय रस्त्याशी एकत्रीकरण.
६.प्रवासाचे अंतर आणि वेळकमी होईल.
७.हजारो प्रवासी, स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणार.
८.स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल


मढ-वर्सोवा ब्रिज प्रकल्पामुळे मढ द्वीपापासून वर्सोवा पर्यंतचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे महानगरातील नागरिकांना आधुनिक, कार्यक्षम आणि भविष्यातील आवश्यकतांसाठी तयार सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळेल. याशिवाय, दहिसर-भायंदर तटीय रस्ता प्रकल्प, मलाड क्षेत्रात समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याशी जोडणारे तीन पूल आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२०० रुपये कोटींचा प्रकल्प, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळेही पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल
घडवून आणेल.

Comments
Add Comment

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू

Central Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; 'या' मार्गांवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावणार

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेचा (Central Railway) रविवारी, २८ जून रोजी विविध अभियांत्रिकी (Engineering) आणि देखभाल (Maintenance) कामांसाठी

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा