मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पियूष गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मढ-वर्सोवा पुलामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार अखेर प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांकरीता पाठपुरावा केला होता. पर्यावरणाचे सर्व आवश्यक संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करून या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची अमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


मुंबईकरांसाठी २२ किमीचे अंतर आता ५ मिनिटांत


मढ-वर्सोवा पूल प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. प्रवासाच्या वेळेत कमी : प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांत होईल.
२. अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर कमी होईल.
३. लांब अंतर पार करण्याची किंवा नौका चालनाची आवश्यकता नष्ट करण्यासाठी थेट
४. रस्त्याचा संपर्क


५. पश्चिम मुंबईत निर्बाध प्रवासासाठी आगामी वर्सोवा-भायंदर तटीय रस्त्याशी एकत्रीकरण.
६.प्रवासाचे अंतर आणि वेळकमी होईल.
७.हजारो प्रवासी, स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणार.
८.स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल


मढ-वर्सोवा ब्रिज प्रकल्पामुळे मढ द्वीपापासून वर्सोवा पर्यंतचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे महानगरातील नागरिकांना आधुनिक, कार्यक्षम आणि भविष्यातील आवश्यकतांसाठी तयार सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळेल. याशिवाय, दहिसर-भायंदर तटीय रस्ता प्रकल्प, मलाड क्षेत्रात समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याशी जोडणारे तीन पूल आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२०० रुपये कोटींचा प्रकल्प, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळेही पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल
घडवून आणेल.

Comments
Add Comment

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष