Vande Bharat 4.0 : वंदे भारत ४.० चा 'सुपर प्लॅन'! वंदे भारत ४.० लवकरच सुरु होणार, रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

पुढील काही महिन्यांत 'वंदे भारत ४.०' धावणार!


नवी दिल्ली : प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishanav) यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये वंदे भारत ४.० (Vande Bharat 4.0) ही नवीन आवृत्तीची रेल्वे सेवा सुरू होणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, ही वंदे भारत ४.० रेल्वे आधीच्या ३.० आवृत्तीपेक्षा अधिक जलद गतीने धावणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी ती जास्त आरामदायी आणि आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. या घोषणेनंतर भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे. वंदे भारत ४.० च्या आगमनाने रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि वेगवान होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे प्रदर्शनात 'वंदे भारत ४.०' ची घोषणा


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ४.० ची महत्त्वपूर्ण घोषणा दिल्लीतील भारत मंडपम येथे केली. ते १६ व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन तीन दिवसांचे असून, ते आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात १५ हून अधिक देशांमधील ४०० हून अधिक कंपन्या त्यांची अत्याधुनिक रेल्वे उत्पादने प्रदर्शित करत आहेत. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड्स, रशिया, स्वित्झर्लंड, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स (अमेरिका) यांसारख्या प्रमुख देशांमधील कंपन्यांचा समावेश आहे. जगातील एवढ्या मोठ्या मंचावरून वंदे भारत ४.० ची घोषणा झाल्यामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.



आता ५२ सेकंदांपेक्षा कमी वेळेत १०० किमी वेग, 'मेक इन इंडिया' रेल्वेची जगात धाव


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, नवी वंदे भारत ४.० ही सर्वात वेगवान असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनी वंदे भारतच्या तांत्रिक प्रगतीबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्याची वंदे भारत ३.० ही रेल्वे ५२ सेकंदांमध्ये शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास (0 ते 100 kmph) वेग वाढवते. हा वेग जपान आणि युरोपमधील काही हाय-स्पीड गाड्यांपेक्षाही अधिक आहे. वंदे भारत ४.० मध्ये ही क्षमता अजून जास्त असेल. सुधारित मोटर तंत्रज्ञान (Motor Technology) आणि हलक्या डिझाईनमुळे (Lighter Design) ही ट्रेन आणखी कमी वेळेत जास्त वेग गाठू शकेल. ही ट्रेन अधिक वेगवान असण्यासोबतच, त्यातील आसनांची सेवा (Seating Services) वाढवण्यात आली आहे आणि कोचची कामगिरी (Coach Performance) इतर ट्रेनपेक्षा अधिक सुधारित केली गेली आहे. आराम, सुरक्षितता आणि डिझाईनमध्येही लक्षणीय सुधारणा असतील. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी भारतीय रेल्वेच्या भविष्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचीही माहिती दिली. भारतीय रेल्वे २०४७ सालापर्यंत ७,००० किलोमीटर लांबीचे कॉरिडॉर विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या भविष्यातील कॉरिडॉरवरील गाड्या ताशी ३५० किमी वेगाने धावू शकणार आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : परदेश दौऱ्यावरून परतताच मोदींची तातडीची बैठक; पेट्रोल-एलपीजीवर मोठा निर्णय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. जवळपास वर्षभरानंतर होत असलेल्या

Cockroach Janta Party : मराठी तरुणाची ‘कॉक्रोच जनता पार्टी’ देशभरात ट्रेंडिंग; ५ दिवसांत १० मिलियन फॉलोअर्स!

मुंबई : देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social