रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन


अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातून धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.


या कालावधीत ई-केवायसी न केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांचे दुकानदाराने मशीनवर अंगठा घेऊन ई-केवायसीचे काम पूर्ण करुन घ्यावे, याबाबत कोणतीही कुचराई करुन नये. ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असून, ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल, त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत दुकानातून धान्याची उचल करावी. त्यासाठी सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने सुरु ठेवून लाभार्थ्यांना १०० टक्के धान्याचे वाटप करावे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी