रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन


अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातून धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.


या कालावधीत ई-केवायसी न केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांचे दुकानदाराने मशीनवर अंगठा घेऊन ई-केवायसीचे काम पूर्ण करुन घ्यावे, याबाबत कोणतीही कुचराई करुन नये. ही लाभार्थ्यांना शेवटची संधी असून, ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात येणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल, त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत दुकानातून धान्याची उचल करावी. त्यासाठी सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी या कालावधीत दुकाने सुरु ठेवून लाभार्थ्यांना १०० टक्के धान्याचे वाटप करावे.

Comments
Add Comment

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.