माझगावमधील बाबू गेनू मंडईत महापालिकेची कार्यालये, पण असुविधांमुळे कर्मचारी हैराण

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची मंडई आणि सेवा निवासस्थान असलेल्या बाबू गेनू मंडईचा पुनर्विकास झाल्यांनतर आता या मंडईच्या जागेमध्ये महापालिकेच्या ई विभाग कार्यालयातील काही विभाग स्थलांतरीत करण्यात आले आहे. परंतु बाबू गेनू मंडईच्या जागेत महापालिकेची कार्यालये स्थलांतरीत केली जात असली तरी प्रत्यक्षात याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा नसल्याने याठिकाणी हलवण्यात आलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.



विशेष म्हणजे सेवा सुविधांचा अभाव तर आहेतच, परंतु याठिकाणी कार्यरत विभागातील कर्मचाऱ्यांना आपले फेस बायोमेट्रीक हजेरीसाठी माझगाव ते भायखळा ई विभाग कार्यालय असे द्रविडी प्राणायम करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा नसताना बाबू गेनू मंडईमध्ये विभाग स्थलांतरीत करण्याची एवढी घाई का होती असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.


महापालिकेच्या ई विभाग कार्यालयांमध्ये असलेल्या मालमत्ता विभाग, सुरक्षा विभाग, दुकान आणि आस्थापने विभाग आदी विभागांचा कारभार २२ ऑक्टोबर २०२५ पासून माझगाव येथील बाबू गेनू मंडईच्या पुनर्विकास केलेल्या नवीन इमारतीच्या वास्तूमध्ये स्थलांतरीत करणयात आला आहे. याठिकाणी सुरक्षा विभागाचा कारभार हलवण्यात आला असला तरी या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाच नाही.



याठिकाणी तीन लिफ्टची सुविधा आहे, परंतु त्यातील एकही लिफ्ट कार्यान्वित झालेली नाही. याठिकाणी टेबल आणि खुर्च्या या जुन्या देण्यात आल्या आहे. एकाबाजुला घोडपदेव येथील कार्यालयामध्ये नवीन फर्निचर दिलेले असताना याठिकाणच्या विभागांसाठी जुन्याच खुर्च्या आणि टेबलची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मालमत्ता विभागाकडे जुना दस्तावेज असतो. जो फार महत्वाचा असतो. पण तोही कपाटे नसल्याने उघड्यावरच पडलेला असल्याने भविष्यात यापैंकी काही फाईल्स गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील