Maharashtra Weather Update : पुढील ७२ तासांत राज्यावर कोणते मोठे संकट? प्रशासनाचा स्पष्ट इशारा; 'अति महत्वाचं काम' म्हणजे नेमकं काय?

काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा कहर आणि अतिवृष्टी अनुभवल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा धडकी भरवणारा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांना, विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशांना, पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, संपूर्ण कोकण आणि गोवा येथे पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात, लक्षद्वीपजवळ हवेची द्रोणीय स्थिती (Trough) निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या वादळी पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, ही द्रोणीय स्थिती १९ ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील या बदलामुळे कर्नाटक आणि केरळपर्यंत समांतर क्षेत्र निर्माण होणार असून, त्याचा थेट प्रभाव कोकण किनारपट्टीच्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे, किनारपट्टीच्या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



चिपळूणमध्ये सकाळपासून हलक्या सरी


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराच्या हवामानात आता स्पष्टपणे बदल जाणवू लागले आहेत. आज सकाळपासूनच शहरात हलक्या सरींची सुरुवात झाली आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या संभाव्य तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील बदलांमुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, जिल्ह्याच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



कोल्हार बुद्रुकमध्ये वीजपुरवठा खंडित


अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक गावात आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यामध्येही अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकाची कापणी केली आहे, त्या कापणी केलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. या अवकाळी आणि वादळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी अशा दोघांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान; मदतीनंतरही शेतकरी संकटात


राज्याच्या विविध भागांत पावसाची तीव्रता पुन्हा वाढू लागली आहे. सध्या दक्षिण रायगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली आहे. केवळ कोकण किनारपट्टीच नव्हे, तर राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असली तरी, अनेक भागांत पाऊस इतका जास्त झाला की, शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच वाहून गेली आहे. त्यामुळे जाहीर झालेली मदत तुटपुंजी ठरत असून, पुन्हा सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण