मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश झाला आहे. ही व्यक्ती मागील ३० वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होती. या व्यक्तीच्या घरी शेकडो भक्त दर्शनासाठी यायचे आशीर्वाद घ्यायचे. या व्यक्तीचे खरे नाव 'बाबू अयान' असून, त्याने स्वतःला भारतीय नागरिक म्हणून दाखण्यासाठी बनावट जन्माचा दाखला, आधार आणि पॅन कार्ड तयार करून घेतले होते. ही कागदपत्र पोलिसांनी तपासणीसाठी पाठवल्यावर हे धक्कादायक सत्य समोर आले.


गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाने श्रद्धेच्या नावाखाली सुमारे ३०० अनुयायींकडून पैसे घेऊन मुंबईतील गोवंडी भागात तब्बल २० घरे खरेदी केली. याच घरांमध्ये धार्मिक विधी व आशीर्वाद सत्रे (सत्संग / प्रवचन) सुरू होती. भाविक 'गुरु माँ'च्या खोट्या दिव्यशक्तीवर विश्वास ठेवून भरघोस दान करत होते.


पोलिस कारवाईत काय आढळलं ?


एटीसएस युनिटने २४ मार्चला रफीक नगर या भागात छापा टाकला असताना, ८बांग्लादेशी ट्रान्सजेंडर व्यक्तीना अटक केली. पण या गुरु माँ ने भारतीय असल्याचा दावा करत बनावट कागदपत्रे पोलिसांना दाखवली. आणि पुढील तपासातून सत्य बाहेर आले. गुरु माँ विरूद्ध पासपोर्ट कायदा १९५०, फॉरेनर्स ऑर्डर १९४८, फॉरेनर्स अॅक्ट १९४६आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत (BNS) गुन्हे दखल झाले आहेत. शिवाजी नगर, नर्पोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला ठाण्यांमध्ये तिच्याविरोधात याआधीच गुरु माँ विरोधात पाच गुन्हे नोंदवले होते.

Comments
Add Comment

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना