वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे.


बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. बांगलादेशचा संघ ५० षटकांत ९ गडी गमावून १९८ धावा करू शकला.बांगलादेशसाठी शोभना मोस्तरीने सर्वाधिक नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग, जॉर्जिया वेअरहॅम, ऍशले गार्डनर आणि ऍनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


१९९ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बांगलादेशी गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. कर्णधार ऍलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड यांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला अवघ्या २४.५ षटकांत विजय मिळवून दिला. एलिसा हिली हिने अत्यंत aggressive फलंदाजी करत आपले सलग दुसरे शतक पूर्ण केले आणि ७७ चेंडूंत नाबाद ११३ धावा केल्या. तिच्या खेळीत २० चौकारांचा समावेश होता.


फोबी लिचफिल्डने देखील तिला उत्कृष्ट साथ दिली आणि ७२ चेंडूंत नाबाद ८४ धावा केल्या. हीली आणि लिचफिल्ड यांच्यातील २०२ धावांची नाबाद सलामी भागीदारी ही महिला विश्वचषकाच्या इतिहासातील गडी न गमावता यशस्वीरित्या गाठलेले सर्वाधिक मोठे लक्ष्य ठरले.


या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात आपले वर्चस्व कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य