महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (एनसीआरबी) 2023 च्या अहवालानुसार, महिलांचे अपहरण हे पुरुषांच्या तुलनेत 5 पट अधिक झाले आहे.


एनसीआरबीच्या अहवालात नमूद केल्यानुसार, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये एकूण अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कोलकाता शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये काहीशी घट झाली असली तरी, दिल्ली ही शहरांमध्ये अजूनही आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये 2023 मध्ये एकूण 8,233 अपहरणाची प्रकरणं नोंदवण्यात आली, ज्यामध्ये महिलांच्या विरोधातील 6,920 घटना होत्या, तर पुरुषांच्या विरोधात 1,590 प्रकरणं नोंदली गेली. म्हणजेच, महिलांचे अपहरण हे पुरुषांच्या तुलनेत जवळपास 5 पट अधिक आहे.2022 मध्ये ही संख्या 8,088 होती, म्हणजेच एका वर्षात राज्यात 145 प्रकरणांनी वाढ झाली आहे.



उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी


क्राईम इन इंडिया 2023 या अहवालात सांगितलं आहे की देशभरात एकूण 1,06,584 अपहरणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. यात उत्तर प्रदेशमध्ये 16,663 प्रकरणं, बिहारमध्ये 14,371, तर महाराष्ट्रात 13,106 प्रकरणं नोंदली गेली आहेत.एनसीआरबीच्या अहवालानुसार, अपहरणाच्या घटनांमध्ये मिझोराम राज्यात सर्वात कमी - फक्त 5 प्रकरणं नोंदवली गेली. तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात 2022 आणि 2023 दोन्ही वर्षांत एकही अपहरणाची नोंद झालेली नाही.



कोलकाता आणि देशातील प्रमुख शहरांची स्थिती


कोलकातामध्ये 2023 मध्ये 281 अपहरणाची प्रकरणं नोंदवण्यात आली. 2022 मध्ये ही संख्या 452, तर 2021 मध्ये 346 होती. याचा अर्थ शहरात अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.पण याउलट, दिल्ली शहरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2022 मध्ये 5,585 प्रकरणं, तर 2023 मध्ये ती संख्या 5,681 वर पोहोचली. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 1,798 अपहरण प्रकरणं नोंदली गेली आहेत.


त्याचवेळी, केरळमधील कोची आणि तमिळनाडूमधील कोयंबतूर या शहरांमध्ये फक्त 16-16 अपहरणाची प्रकरणे नोंदली गेली असून, ती देशातील शहरांमध्ये सर्वात कमी आहेत.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती