ऐन दिवाळीत वाढीव बोनस साठी बेस्ट आणि अदानीच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

मुंबई: दिवाळी अगदी तोंडावर आलेली असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. बेस्ट उपक्रम आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या हजारो कामगारांनी वाढीव बोनसच्या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात मुंबई शहर आणि उपनगरात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


बोनसच्या मागणीसाठी केवळ बेस्टच नाही, तर उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही आंदोलनाची तयारी करावी लागत आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे.


युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी थेट इशारा दिला आहे. त्यांच्या मागणीनुसार, बेस्ट उपक्रमाने ८.३३ टक्के आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस द्यावा, अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे. वाढीव बोनसच्या मागणीवर दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी ठाम असून, या मागणीवर चर्चा करण्यासाठी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.



बेस्ट उपक्रमाची स्थिती आणि मागणी


बेस्ट उपक्रमाने गेल्या काही वर्षांत परिवहन, अभियांत्रिकी, सामान्य प्रशासकीय विभाग आणि वीज पुरवठा विभागातील सुमारे १५ हजार स्थायी पदे रिक्त ठेवली आहेत. या रिक्त पदांवर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच कायम पदावर असलेल्या हंगामी कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. या माध्यमातून बेस्ट उपक्रमाने कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे, त्यामुळे कामगारांना वाढीव बोनस मिळाला पाहिजे, अशी मागणी विठ्ठलराव गायकवाड यांनी केली आहे.


याशिवाय, बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार १ एप्रिल २०१६ पासून प्रलंबित आहे. औद्योगिक न्यायालयाने ८.३३ टक्के दराने दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार बोनसचे वाटप झाले नाही, तर आंदोलन अटळ आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.



अदानी कंपनीतील कामगारांची मागणी


अदानी कंपनीच्या आस्थापना विभागातील तीन हजार स्थायी पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबलेली आहे, आणि कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम पदावर सामावून घेण्यात आलेले नाही. यामुळे अदानी कंपनीनेही कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे. वेतनवाढीचे दोन करार न्यायालयात प्रलंबित असताना, कंपनीला दरवर्षी सरासरी दोन हजार कोटी रुपयांचा फायदा होत आहे. त्यामुळे स्थायी आणि कंत्राटी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी युनियनची मागणी आहे. या मागणीवर कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईतील कामगारही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला