मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे मुंबई शहर आणि उपनगरमधील कोणत्याही मुद्रांक शुल्क कार्यालयात क्षेत्रीय मर्यादेची अट न ठेवता दस्त नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे 'वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन' या धोरणाकडे आणखी एक पाऊल टाकण्यात आले आहे.


महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, त्या संदर्भातील राजपत्र देखील जारी करण्यात आले आहे.


नवीन निर्णयामुळे काय बदलणार?


पूर्वी मुंबईत दस्तऐवज नोंदणी करण्यासाठी नागरिक ज्या भागात राहत होते किंवा ज्या भागात मालमत्ता होती, त्याच क्षेत्रातील विशिष्ट मुद्रांक कार्यालयात जाणे बंधनकारक होते. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.


मुंबईतील 'या' सहा कार्यालयात नोंदणी सुविधा


मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक आता खालील सहा प्रमुख मुद्रांक कार्यालयांत आपला मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र तसेच अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील


बोरिवली


कुर्ला


अंधेरी


मुंबई शहर (Mumbai City)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement I)


प्रधान मुद्रांक कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस (Collector of Stamps Enforcement II)


हा निर्णय मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा असून, महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


महसूल विभागाचा आणखी एक मोठा निर्णय


यासोबतच महसूल विभागाने जमीन मोजणी संदर्भातही एक मोठा निर्णय घेतला आहे. जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर खासगी परवानाधारक भूमापकांच्या मदतीने हे काम केवळ ३० दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वी यासाठी ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागायचा.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७