जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याचे ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.


या घटनेप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनिवारी पोलिसांनी साईट अभियंता शंभू कुमार पलट पासवान (२९) आणि गौरव दिनेशभाई सोनडगर (३९) या दोघांना अटक केली. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तपास सुरू असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अखेर कडक पाऊल उचलत इमारतीचा विकासक, ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी ८ ऑक्टोबरला सकाळी घडली होती. मृत तरुणी आपल्या कामावर जात असताना, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून अचानक एक वीट डोक्यात पडल्यामुळे रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा