राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी


ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तवला होता. परंतु आताच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात १५ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी, अशा सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.


मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो. येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता राहील. तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात.


मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघार घेईल, असा अंदाज होता. मुंबईतून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. दसऱ्यापर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावासाच्या सरी कोसळल्या होत्या. ५ किंवा ६ ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप तरी मुंबईत पावसाने दडी मारली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वादळी पावसाचा मुंबईवर परिणाम होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या!

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या ! विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी): एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी