Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना दुर्धर असा आजार झाला होता. त्यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. रेड सॉईल स्टोरीज हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले यूट्यूब चॅनेल कोकणच्या निसर्गरम्यतेचे दर्शन घडवणारे तसेच आपल्या मातीतील रेसिपीजना जगासमोर आणण्याचे काम करत होते. या चॅनेलच्या माध्यमातून शिरीष आणि पूजा हे लाडके जोडपे समोर आले होते. या चॅनेलला जगभरातून पसंती मिळत होती. देशातच नव्हे तर देशाबाहेरही या चॅनेलला पसंती दिली जात होती.


सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक दिवस शिरीष गवस यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. या बातमीने साऱ्यांनाच धक्का दिला. शिरीष गवस यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनेकांनी याचे भांडवल केले. व्ह्यूज मिळवण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यातून शिरीष गवस यांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. तीन महिन्यानंतर पहिल्यांदा आता शिरीष गवस यांच्या पत्नी पूजा गवस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिरीष यांच्या मृत्यूचे सत्य समोर आणले आहे. शिरीष यांच्या तब्येतीबाबत नेमके काय घडले याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ समोर आणला आहे.



या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शिरीष गवस यांचे आजारपण, उपचार, त्यासाठीचा त्यांचा प्रतिसाद आणि अचानक एक दिवस त्यांचे सोडून जाणे याबाबत सांगितले आहे. तसेच शिरीष यांचे स्वप्न असलेले हे यूट्यूब चॅनेल त्या सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


 
Comments
Add Comment

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :