Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना दुर्धर असा आजार झाला होता. त्यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. रेड सॉईल स्टोरीज हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले यूट्यूब चॅनेल कोकणच्या निसर्गरम्यतेचे दर्शन घडवणारे तसेच आपल्या मातीतील रेसिपीजना जगासमोर आणण्याचे काम करत होते. या चॅनेलच्या माध्यमातून शिरीष आणि पूजा हे लाडके जोडपे समोर आले होते. या चॅनेलला जगभरातून पसंती मिळत होती. देशातच नव्हे तर देशाबाहेरही या चॅनेलला पसंती दिली जात होती.


सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक दिवस शिरीष गवस यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. या बातमीने साऱ्यांनाच धक्का दिला. शिरीष गवस यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनेकांनी याचे भांडवल केले. व्ह्यूज मिळवण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यातून शिरीष गवस यांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. तीन महिन्यानंतर पहिल्यांदा आता शिरीष गवस यांच्या पत्नी पूजा गवस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिरीष यांच्या मृत्यूचे सत्य समोर आणले आहे. शिरीष यांच्या तब्येतीबाबत नेमके काय घडले याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ समोर आणला आहे.



या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शिरीष गवस यांचे आजारपण, उपचार, त्यासाठीचा त्यांचा प्रतिसाद आणि अचानक एक दिवस त्यांचे सोडून जाणे याबाबत सांगितले आहे. तसेच शिरीष यांचे स्वप्न असलेले हे यूट्यूब चॅनेल त्या सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील