भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा


नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी ५८ धावांची आवश्यकता आहे. याआधी नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या. यानंतर भारताने डाव घोषीत केला. नंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद २४८ धावा केल्या. भारताने फॉलोऑन दिल्यामुळे सलग दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या विंडीजने नंतरच्या डावात सर्वबाद ३९० धावा केल्या आणि भारतापुढे जिंकण्यासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवले.


दिल्ली कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत शेवटच्या डावाची फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. यशस्वी जयस्वाल आठ धावा करुन वॉरिकनच्या चेंडूवर अँडरसनकडे झेल देऊन परतला. केएल राहुल २५ आणि साई सुदर्शन ३० धावांवर खेळत आहे. आतापर्यंत भारताने एक बाद ६३ धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची आवश्यकता आहे.


याआधी विंडीजकडून दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात कॅम्पबेलने ११५ धावा, चंदरपॉलने १० धावा, अथानाझेने ७ धावा, होपने १०३ धावा, चेसने ४० धावा, इमलाचने १२ धावा, ग्रीव्हजने ५० धावा, पियरेने शून्य धावा, वॉरिकनने ३ धावा, फिलिपने २ धावा, सील्सने ३२ धावा केल्या. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.


दिल्ली कसोटीत भारत जिंकला तर विंडीज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका भारत २-० अशी जिंकेल. विंडीजला व्हाईटवॉश देण्यात भारत यशस्वी होईल.


भारताने अहमदाबाद कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकली होती. आता दिल्ली कसोटी जिंकल्यास भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थिती सुधारण्यास मदत होणार होणार आहे. सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने सहा पैकी तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारताचा दोन कसोटी सामन्यात पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने ४० गुण मिळवले आहेत.


Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने