भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा


नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी ५८ धावांची आवश्यकता आहे. याआधी नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात पाच बाद ५१८ धावा केल्या. यानंतर भारताने डाव घोषीत केला. नंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद २४८ धावा केल्या. भारताने फॉलोऑन दिल्यामुळे सलग दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या विंडीजने नंतरच्या डावात सर्वबाद ३९० धावा केल्या आणि भारतापुढे जिंकण्यासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवले.


दिल्ली कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत शेवटच्या डावाची फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. यशस्वी जयस्वाल आठ धावा करुन वॉरिकनच्या चेंडूवर अँडरसनकडे झेल देऊन परतला. केएल राहुल २५ आणि साई सुदर्शन ३० धावांवर खेळत आहे. आतापर्यंत भारताने एक बाद ६३ धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची आवश्यकता आहे.


याआधी विंडीजकडून दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात कॅम्पबेलने ११५ धावा, चंदरपॉलने १० धावा, अथानाझेने ७ धावा, होपने १०३ धावा, चेसने ४० धावा, इमलाचने १२ धावा, ग्रीव्हजने ५० धावा, पियरेने शून्य धावा, वॉरिकनने ३ धावा, फिलिपने २ धावा, सील्सने ३२ धावा केल्या. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.


दिल्ली कसोटीत भारत जिंकला तर विंडीज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका भारत २-० अशी जिंकेल. विंडीजला व्हाईटवॉश देण्यात भारत यशस्वी होईल.


भारताने अहमदाबाद कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकली होती. आता दिल्ली कसोटी जिंकल्यास भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थिती सुधारण्यास मदत होणार होणार आहे. सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने सहा पैकी तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारताचा दोन कसोटी सामन्यात पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने ४० गुण मिळवले आहेत.


Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत