आधी दशावतार आणि आता गोंधळची जोरदार चर्चा

मुंबई : नुकतेच 'दशावतार', 'कांतारा' यांसारखे मातीशी जोडलेले सिनेमे आपल्या भेटीला आले. त्यात आता गोंधळ या सिनेमाचीही भर पडणार आहे. काही सेकंदाच्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. दशावतार प्रमाणे गोंधळ सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला खेळ आहे इथल्या लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. कर्नाटकाच्या २० टक्के भागात 'कांतारा' हि संस्कृती जपली जाते, तर संपूर्ण कोकणात 'दशावतार' आणि ८० टक्के महाराष्ट्रात 'गोंधळ' हा खेळ ही संस्कृती जपली जाते.


कांतारा आणि दशावतार या सिनेमांनी आपल्या दाखवून दिलं कि प्रेक्षक हा किती पुढारलेला असला तरी त्याची नाळ मातीशी अजूनही जुळलेली आहे. गोंधळ सिनेमा हाच वारसा जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचे सुंदर सादरीकरण करणार आहे. टिझर मधूनच पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यायचा सुंदर संगम दिसून येत आहे. मुळात नवीन जोडप्यांच्या सुखासाठी लग्नानंतर देवाचा किंवा देवीच्या गोंधळ मांडला जातो.या सिनेमात तसंच काहीसं नवरा नवरीच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलघडणारी ही कथा काहीतरी वेगळंच गूढ आणि रहस्य घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


एका मुलाखतीत चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष डावखरे म्हणाले "गोंधळ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि श्रद्धेचे दर्शन आहे. कांतारा ने आपल्या लोककलेला नवा आयाम दिला तसाच गोंधळ महाराष्ट्रातील श्रद्धा, गुढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमच उद्धिष्ट हेच आहे की ही माती, हा रंग, आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची आहे.


डावखरे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद संतोष डावखरे यांनी लिहिला असून चित्रपटाला पदमविभूषण इलैयाराजा यांनी संगीत दिलं आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखरे असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगोश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर आणि ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून

करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील

एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला ....

काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती.

Dhurandhar 2 : धुरंधर २ खरचं ठरला धुरंधर, बॉक्सऑफिसवर ओलांडला ५०० कोटींचा टप्पा

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी अभिनेत्यानं केली नवीन सुरुवात, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

नवीन वर्षात अनेकजण नवीन सुरुवात करण्याासाठी सज्ज झालेले असतात. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्यानं