जिल्ह्यात दिवाळीसाठी ५० जादा गाड्या

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा


रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्यांचा जवळपास २० हजार ८८० किलोमीटर प्रवास होणार आहे. यंदा दिवाळी सुट्टीसाठी एसटी महामंडळाने राज्य मध्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


यंदा दीपावलीमध्ये १८ऑक्टोबर धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान, २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा तसेच २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज असे महत्वाचे सण असल्याने याशिवाय दीपावलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने प्रामुख्याने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने ही जादा वाहतूक सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


रायगड जिल्ह्यात असणारे गडकिल्ले, लाभलेला सागरी किनारा, धार्मिक स्थळे आदी गोष्टींमुळे राज्यभरातून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने ही जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य मध्य कार्यालयाच्या माध्यमातून १०८४२.२ किलोमीटर प्रवासासाठी २५ जादा फेऱ्या, प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २६९९.९ किलोमीटर प्रवासासाठी ७ जादा फेऱ्या आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ७३३८ किलोमीटर प्रवासासाठी १८ जादा फेऱ्या अशा एकूण २० हजार ८८०.१ किलोमीटर प्रवासासाठी एसटी महामंडळाने ५० जादा फेऱ्यांचे नियोजन रायगड जिल्ह्यासाठी केले आहे.


दरम्यान दिवाळी सुट्टीचा विचार करता १५ ऑक्टोबरपासूनच अगदी सुट्टी संपेपर्यंत म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाने आरक्षण सवलत सुरू ठेवली असून जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांसह इतर नियमित पावणेदोनशेच्या आसपास फेऱ्या देखील सुरूच राहणार असल्याने एसटी प्रवासी समाधान व्यक्त
करत आहेत.

Comments
Add Comment

मुंब्रा,कुर्ल्यात ATS छापे; 'अल्-कायदा' लिंकचा संशय!

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संशयित मूलतत्त्ववादी गतिविधींच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी मुंब्रा

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर, विराट कोहलीने बाबरला टाकले मागे

दुबई : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. विराट ७२५

SA20 चा भारतात जलवा! 'इंडिया डे' कार्यक्रमात चाहत्यांचा तुफान उत्साह, चौथ्या सीझनसाठी लीग सज्ज

२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत