जिल्ह्यात दिवाळीसाठी ५० जादा गाड्या

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा


रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्यांचा जवळपास २० हजार ८८० किलोमीटर प्रवास होणार आहे. यंदा दिवाळी सुट्टीसाठी एसटी महामंडळाने राज्य मध्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


यंदा दीपावलीमध्ये १८ऑक्टोबर धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान, २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा तसेच २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज असे महत्वाचे सण असल्याने याशिवाय दीपावलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने प्रामुख्याने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने ही जादा वाहतूक सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


रायगड जिल्ह्यात असणारे गडकिल्ले, लाभलेला सागरी किनारा, धार्मिक स्थळे आदी गोष्टींमुळे राज्यभरातून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने ही जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य मध्य कार्यालयाच्या माध्यमातून १०८४२.२ किलोमीटर प्रवासासाठी २५ जादा फेऱ्या, प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २६९९.९ किलोमीटर प्रवासासाठी ७ जादा फेऱ्या आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ७३३८ किलोमीटर प्रवासासाठी १८ जादा फेऱ्या अशा एकूण २० हजार ८८०.१ किलोमीटर प्रवासासाठी एसटी महामंडळाने ५० जादा फेऱ्यांचे नियोजन रायगड जिल्ह्यासाठी केले आहे.


दरम्यान दिवाळी सुट्टीचा विचार करता १५ ऑक्टोबरपासूनच अगदी सुट्टी संपेपर्यंत म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाने आरक्षण सवलत सुरू ठेवली असून जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांसह इतर नियमित पावणेदोनशेच्या आसपास फेऱ्या देखील सुरूच राहणार असल्याने एसटी प्रवासी समाधान व्यक्त
करत आहेत.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे