जिल्ह्यात दिवाळीसाठी ५० जादा गाड्या

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा


रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्यांचा जवळपास २० हजार ८८० किलोमीटर प्रवास होणार आहे. यंदा दिवाळी सुट्टीसाठी एसटी महामंडळाने राज्य मध्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


यंदा दीपावलीमध्ये १८ऑक्टोबर धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान, २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा तसेच २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज असे महत्वाचे सण असल्याने याशिवाय दीपावलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने प्रामुख्याने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने ही जादा वाहतूक सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


रायगड जिल्ह्यात असणारे गडकिल्ले, लाभलेला सागरी किनारा, धार्मिक स्थळे आदी गोष्टींमुळे राज्यभरातून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने ही जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य मध्य कार्यालयाच्या माध्यमातून १०८४२.२ किलोमीटर प्रवासासाठी २५ जादा फेऱ्या, प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २६९९.९ किलोमीटर प्रवासासाठी ७ जादा फेऱ्या आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ७३३८ किलोमीटर प्रवासासाठी १८ जादा फेऱ्या अशा एकूण २० हजार ८८०.१ किलोमीटर प्रवासासाठी एसटी महामंडळाने ५० जादा फेऱ्यांचे नियोजन रायगड जिल्ह्यासाठी केले आहे.


दरम्यान दिवाळी सुट्टीचा विचार करता १५ ऑक्टोबरपासूनच अगदी सुट्टी संपेपर्यंत म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाने आरक्षण सवलत सुरू ठेवली असून जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांसह इतर नियमित पावणेदोनशेच्या आसपास फेऱ्या देखील सुरूच राहणार असल्याने एसटी प्रवासी समाधान व्यक्त
करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

रत्नागिरी जिल्ह्यात मर्सिडीज बेंझ जळून खाक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही

देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन ‘या’ राज्यात मिळते

भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी

जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने