टी-२०मधील सर्वात धक्कादायक निकाल, दुबळ्या नामिबियाने बलाढ्य द. आफ्रिकेला हरवले


विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच ४ गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.


या विजयामुळे नामिबियाने क्रिकेट जगतात एक मोठी नोंद केली आहे. हा सामना नामिबिया क्रिकेट ग्राउंड विंडहोक  येथे खेळवण्यात आला होता.



क्विंटन डी कॉकचे पुनरागमन ठरले अपयशी


दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विनटन डी कॉक (Quinton de Kock) या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता, पण तो केवळ १ धाव काढून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३४ धावा करू शकला. नामिबियाकडून रुबेन ट्रंपलमनने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने २८ धावा देऊन ३ बळी घेतले.



नामिबियाचा थरारक विजय


१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने २० षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवला. नामिबियाला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. यष्टीरक्षक फलंदाज झेन ग्रीनने (Zane Green) चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.


झेन ग्रीनने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावांची खेळी केली, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने २१ धावांचे योगदान दिले. हा विजय नामिबियासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण नामिबियाने प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.


Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे