बिहारमध्ये पेच सुटला, एनडीएचे जागावाटप जाहीर


पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाल्यानंतर काही जागांवरुन वाद झाला आणि नवा पेच निर्माण झाला. अखेर हा पेच सुटला आणि एनडीएने जागावाटपाचे नवे सूत्र जाहीर केले. यानुसार जनता दल संयुक्त अर्थात जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी किंवा भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.





बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यात जेडीयू आणि बीजेपी (भाजप) हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चिराग रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) २९ जागा लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) हे प्रत्येकी सहा जागा लढवणार आहेत.


मागील निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट उत्तम होता. भाजपने २०२० मध्ये ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजप १०१ जागा लढवणार आहे. भाजपने नऊ जागांचे बलिदान मित्रपक्षांसाठी दिले आहे. यंदा एनडीएमध्ये दोन पक्ष वाढले आहेत. तर एक पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे. लोजप (आर) आणि रालोमो पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपने (आर) जागावाटपात २९ जागा मिळवल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लोजप स्वबळावर लढला होता. त्यांनी १३४ जागांवर उमेदवार दिले. यातील बहुतांश जागा एनडीएमध्ये जेडीयूच्या वाट्याला गेल्या होत्या. भाजपला केवळ १ जागा जिंकता आली. पण लोजप उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे जेडीयूने जवळपास ३५ जागा गमावल्या. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जेडीयू २०२० मध्ये ४३ जागांवर आला. जेडीयूने ३५ जागा गमावल्याने भाजप एनडीएमध्ये आपोआप मोठा भाऊ झाला. एनडीएला १२५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले.


Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग