भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण कमी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने भारतीय आहाराविषयी केलेल्या ताज्या संशोधनाअंती हा धक्कादायक अहवाल दिला आहे. या असंतुलित आहारामुळे मधुमेह, स्थूलता, रक्तदाब अशा समस्यांनी त्रासलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. नेचर मेडिसिनच्या जर्नलमध्ये आयसीएमआरचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.


भारतातील पारंपरिक जेवण पद्धत संस्कृतीच्या मुळाशी खोलवर रुजलेली आहे. पण आधुनिक आहारातील पद्धतींमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ आणि हेल्थी फॅट्सचा समावेश करणे गरजेचे आहे. हा बदल केला तर अनेक आजारांना आळा घालण्या मदत होईल. अंड, पनीर, ग्रीक योगर्ट, दही, कडधान्य, सोयाबीन किंवा टोफु, मासे, ड्रायफ्रुट्स यात प्रथिने आणि हेल्दी फॅट्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे आधुनिक आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मत आयसीएमआरने व्यक्त केले आहे.


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासात ३६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)मधील शहरी आणि ग्रामीण भागातील १.२१ लाखांहून अधिक प्रौढांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात भारताच्या आहाराचा आणि पचनक्रियेत येणाऱ्या समस्यांचा सर्वात व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय आहारात दररोज ६२ टक्के फॅट कार्बोहायड्रेट्समधून येतात. हे कार्ब्स जास्त प्रमाणात पांढरा भात, दळलेले धान्य आणि साखरेतून येतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे, असे आयसीएमआरने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात

चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास

तवांग : चीन सीमेजवळच्या भारतीय गावांचा झपाट्याने विकास सुरू आहे. तवांग जिल्ह्यातील सीमेजवळच्या १५० गावांमध्ये

पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई