निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. या निर्णयांतर्गत ज्या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी १२ वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकृत फोटो ओळखपत्रांचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या मतदारांकडे त्यांचे फोटो ओळखपत्र नाही किंवा त्यांचे ओळखपत्र हरवले आहे, अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, जर मतदाराकडे मतदार ओळखपत्र (EPIC) नसेल तर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक, सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पेन्शन दस्तऐवज, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, सरकारी सेवा केंद्र स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड किंवा मतदार यादीत सूचीबद्ध असलेले फोटो ओळखपत्र यांसारखे इतर वैध ओळखपत्र देखील मतदानासाठी वापरले जाऊ शकतात.


प्रत्येक नागरिकाला सोयीस्कर आणि सुरक्षित पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी, मतदान केंद्रावर मतदारांनी सादर केलेल्या ओळखपत्रांची पडताळणी केल्यानंतरच त्यांना मतदानाची परवानगी दिली जाते.


मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनानंतर १५ दिवसांच्या आत नवीन मतदारांना EPIC (मतदार ओळखपत्र) प्रदान करावे, असे निर्देश सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा हवाला देत, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, पर्यायी ओळखपत्र म्हणून खालील कागदपत्रे स्वीकारली जातील.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू