गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी व बांधकामे ताब्यात घेण्यात आली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेला मोबदला अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर मार्गी लागला. मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांकडून बँक तपशील, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रे घेतली जात असून, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठा घोळ निर्माण झाला आहे.


सन २००० पासून प्रलंबित रक्कम, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व्याजासह दिला जात आहे, परंतु त्याचवेळी जमीन ताब्यात घेताना अस्तित्वात असलेली घरे, शेड किंवा इतर आस्थापना यांच्या मोबदल्यावर व्याजाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सामायिक जमिनीत स्वतःच्या खर्चाने घरे उभारली होती. या घरांचा मोबदला मूळ मालकास न देता सामायिक हिस्सेदारांमध्ये विभागणी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


“घर ज्याने बांधले, तर तुटलेल्या घराचा मोबदला त्यालाच मिळाला पाहिजे,” अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, उतारे आणि असेसमेंट रेकॉर्डच्या आधारे घराची खरी मालकी ठरवून मोबदला दिला पाहिजे होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार झाला आहे. भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हरकती नोंदवण्यासाठी सरकारने मुदत वाढवावी आणि घरे आस्थापनांच्या मोबदल्यावर व्याजासकट रक्कम द्यावी,” अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची