गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी व बांधकामे ताब्यात घेण्यात आली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेला मोबदला अखेर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तक्षेपानंतर मार्गी लागला. मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांकडून बँक तपशील, छायाचित्रे व आवश्यक कागदपत्रे घेतली जात असून, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठा घोळ निर्माण झाला आहे.


सन २००० पासून प्रलंबित रक्कम, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व्याजासह दिला जात आहे, परंतु त्याचवेळी जमीन ताब्यात घेताना अस्तित्वात असलेली घरे, शेड किंवा इतर आस्थापना यांच्या मोबदल्यावर व्याजाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सामायिक जमिनीत स्वतःच्या खर्चाने घरे उभारली होती. या घरांचा मोबदला मूळ मालकास न देता सामायिक हिस्सेदारांमध्ये विभागणी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


“घर ज्याने बांधले, तर तुटलेल्या घराचा मोबदला त्यालाच मिळाला पाहिजे,” अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, उतारे आणि असेसमेंट रेकॉर्डच्या आधारे घराची खरी मालकी ठरवून मोबदला दिला पाहिजे होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार झाला आहे. भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “हरकती नोंदवण्यासाठी सरकारने मुदत वाढवावी आणि घरे आस्थापनांच्या मोबदल्यावर व्याजासकट रक्कम द्यावी,” अशी मागणीही शेतकरी संघटनांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी