पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या: कारणे आणि उपाय

मुंबई : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. विशेषतः ३०-३५ वर्षांनंतर अनेक पुरुषांच्या केसांची घनता कमी होऊ लागते, तर काहींना तरुण वयातच केसगळतीची समस्या जाणवू लागते. काही पुरुषांना अगदी २० व्या वर्षीच केसगळती ची समस्या जाणवते. हि समस्या मानसिक तणावाचे कारण ठरू शकते.


केसगळतीमुळे बदलणाऱ्या लूकमुळे अनेक पुरुष कृत्रिम केसांचा वापर करतात, विग लावतात किंवा हेअर ट्रान्सप्लांटसारख्या पद्धतींचा अवलंब करतात. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, तर काही जण ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं झालं, तर केस हे शरीराचा एक सामान्य भाग आहेत. केस गळणे ही कोणतीही लाज वाटावी अशी गोष्ट नाही.


पुरुषांमध्ये केस गळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया (Androgenetic Alopecia), ज्याला सामान्य भाषेत मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटले जाते. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे होते – अनुवांशिकता आणि टेस्टोस्टेरॉन या पुरुष हार्मोनचा परिणाम. केसगळतीची सुरुवात डोक्याच्या मध्यभागी किंवा कपाळापासून होते आणि हळूहळू संपूर्ण टाळूपर्यंत पोहोचते.


याशिवाय पौष्टिकतेचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, रसायनांचा अति वापर, हार्मोनल बदल, आणि टाळूवरील संसर्ग यांसारखी अनेक कारणे केसगळतीला कारणीभूत ठरू शकतात.


आजच्या घडीला केस गळतीवर विविध उपचार उपलब्ध आहेत, घरगुती उपाय, औषधोपचार, विशेष तेलं, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे केस प्रत्यारोपण (Hair Transplant). मात्र कोणताही उपचार सुरू करण्याआधी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.


शेवटी केस हे सौंदर्याचा भाग असतात. पण केस गळणे म्हणजे कमजोरी नाही, तर त्यावर योग्य उपाय आणि ते स्वीकारणे आवश्यक आहे. लुकमध्ये बदल करण्यासाठी जर कृत्रिम केस किंवा इतर पद्धतींचा वापर केला जात असेल, तर त्यामध्ये कोणतीही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. तसेच समाजानेदेखील याकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

मुंबई : ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुकामेवा हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामध्ये खजूर हे एक

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी